धुळे शहरात सरकारच्या फाईली रस्त्यावर, वळवाच्या पावसाने उडवली दाणादाण

नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यात काल रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा नशिकमधील अनेक मोठ्या शहराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला, अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी साचलेले पाहायला मिळाले. दरम्यान धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात देखील पावसाचे पाणी शिरल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईली भिजल्या, ज्या सुकवण्यासाठी रस्त्यावर वाळत घालण्याची नामुष्की कर्मचाऱ्यांवर ओढावली.


काल रात्री झालेल्या वळवाच्या पावसाने धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणी झाले.  या पावसाने शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दाणादाण उडवून दिली असून, ज्यामध्ये महत्त्वाच्या फाईली भिजल्या. त्या सर्व फाईली कार्यालयासमोरील पटांगणात उन्हात वाळू घातल्याचं पाहायला मिळत आहे.  एका अवकाळी पावसामुळे कार्यालयाला लागलेली गळती लक्षात घेता,  त्याच्या दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचंही म्हटलं जात आहे.



शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी 


शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.



राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात


राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची  रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबईत पावसाच्या सरी बरसत आहेत.   या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .