धुळे शहरात सरकारच्या फाईली रस्त्यावर, वळवाच्या पावसाने उडवली दाणादाण

  39

नाशिक: राज्यातील अनेक जिल्ह्यात काल रविवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा नशिकमधील अनेक मोठ्या शहराला मोठ्या प्रमाणावर फटका बसला, अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी साचलेले पाहायला मिळाले. दरम्यान धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात देखील पावसाचे पाणी शिरल्याचे वृत्त आहे. ज्यामुळे शिक्षण विभागातील महत्त्वाच्या फाईली भिजल्या, ज्या सुकवण्यासाठी रस्त्यावर वाळत घालण्याची नामुष्की कर्मचाऱ्यांवर ओढावली.


काल रात्री झालेल्या वळवाच्या पावसाने धुळे शिक्षण विभागाच्या कार्यालयात पाणीच पाणी झाले.  या पावसाने शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दाणादाण उडवून दिली असून, ज्यामध्ये महत्त्वाच्या फाईली भिजल्या. त्या सर्व फाईली कार्यालयासमोरील पटांगणात उन्हात वाळू घातल्याचं पाहायला मिळत आहे.  एका अवकाळी पावसामुळे कार्यालयाला लागलेली गळती लक्षात घेता,  त्याच्या दुरुस्तीची गरज व्यक्त होत आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केल्याचंही म्हटलं जात आहे.



शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी 


शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली असून या संदर्भात आपण जिल्हा परिषदेकडे देखील कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती शिक्षण अधिकारी मनीष पवार यांनी दिली आहे.



राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात


राज्यात आजपासून मुसळधार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पाऊस पडेल असे हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाडा भागात पाऊस सुरु, होईल असा ही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची  रिपरिप सुरु आहे. सोमवारी पहाटेपासूनही मुंबईत पावसाच्या सरी बरसत आहेत.   या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

Senior Citizen Suicide: ८६ वर्षीय आजोबांची आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिले...

नेरळ मधील तलावात ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या करत संपवले जीवन नेरळ: आयुष्याला कंटाळून एका वृद्ध व्यक्तीने नेरळ