विराट कोहलीला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे- सुरेश रैना

  42

बंगळूरू : भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावर सोशल मीडियावर अद्याप प्रतिक्रिया उमटत आहे. विराट कोहलीला सन्मानाने निवृत्ती मिळायला हवी होती, अशी नाराजी सर्वांनी व्यक्त केली. त्यातच विराट कोहलीला भारतरत्न मिळालायला हवा, अशी मागणी चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने केली आहे. सुरेश रैनाच्या वक्तव्यानंतर विराट कोहली आणि भारतरत्न सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.


भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने विराट कोहलीला भारत रत्न देण्याची मागणी केली आहे. शनिवार(दि. १७) आयपीएलमधील आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान सुरेश रैनाने लाईव्ह टीव्हीवर चर्चेदरम्यान हा मुद्दा उपस्थित केला.कोहलीच्या टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेनंतर रैनाने त्याला सन्मानित करण्यासाठी हा सल्ला दिला आहे. सुरेश रैना म्हणाला की , 'विराट कोहलीने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. त्याने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले, त्यासाठी त्याला भारतरत्नाने सन्मानित केले पाहिजे. भारत सरकारने त्याला हा सर्वोच्च सन्मान द्यावा.'


भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहलीने १२ मे रोजी अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयपीएल सुरू असतानाच विराट कोहलीने इन्स्टाग्राम पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. किंग कोहलीला मैदानावर शानदार निरोप मिळेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. परंतु त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीला भारतरत्न मिळणार की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल. कोहलीच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत सरकार ही मागणी कितपत गांभीर्याने घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोहलीच्या चाहत्यांमध्येही या मागणीला पाठिंबा मिळत आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीला भारतरत्न देण्यात यावा, या मागणीने जोर धरला आहे.


भारतीय क्रिकेट इतिहासात आतापर्यंत फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला भारत रत्न मिळाला आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने सचिनला भारत रत्न देण्याची शिफारस केली होती आणि तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी हा सन्मान प्रदान केला. विशेष म्हणजे, खेळाडूंना भारत रत्न देण्याचा कोणताही नियम त्यावेळी नव्हता. सचिनसाठीच प्रथम नियमांत बदल करण्यात आले होते. त्यानंतर आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला