Solapur Textile Fire: सोलापूरमधील टेक्सटाईल कारखान्यातील मृतांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत

सोलापूर: सोलापुर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका टेक्सटाईल कारखान्याला रविवारी मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये  तब्बल 8 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  या दुर्दैवी घटनेची दखल घेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देणार असल्याचे जाहीर केले आहे.


अक्कलकोट एमआयडीसीतील कारखान्याला लागेल्या आगीच्या धुराने अख्ख्या सोलापूरवासीयांच्या डोळ्यात पाणी आले.  या दुर्घटनेत 8 निष्पापांचा जीव गेला असून त्यात एक वर्षाच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे.



मालकासह कुटुंबातील 5 आणि 3 कामगारांचा होरपळून मृत्यू  


नरसंहार ठरलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी टेक्सटाईल कारखान्याचे मालक उस्मान मनसुरी आपल्या कुटुंबीयांसोबत वरच्या मजल्यावरील मास्टर बेडरुममध्ये लपून बसले होते. त्यामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत कुटुंबातील 5 निष्पाप जणांचा आणि कंपनीतील तीन कामगारांचा आगीत होरपळून  मृत्यू झाला. शोधकार्य सुरु असतानच या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व आठही मृतदेह हे सर्व विच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आले आहेत.



मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांना 5 लाख रुपयांची मदत


सोलापुरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या 8 जणांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.


मृतांची नावे


सेंट्रल इंडस्ट्रीचे मालक उस्मान मनसुरी (वय 87)


अनस मनसुरी (वय 24)


शीफा मनसुरी (वय24)


युसूफ मनसुरी (वय 1.6)


आयेशा बागबान (वय 38)


मेहताब बागवान (वय 51)


हिना बागवान (वय 35)


सलमान बागवान (वय 38)

Comments
Add Comment

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी