Pune News: उजनी धरणाकाठच्या रहिवाशांना भयंकर आजाराचा धोका! दूषित पाण्यामुळे कॅन्सर, त्वचारोगाची शक्यता

पुणे: सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत आहे, पुण्यात सुद्धा ऐन मे महिन्याच्या गरमीत अवकाळीने हजेरी लावली आहे.याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील उजनी धरणातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाच्या पाण्याबरोबरच पुण्यातील विविध रासायनिक कंपन्यांमधून निघणाऱ्या रासायनिक व प्रदूषित पाण्याने उजनी धरणातील पाणी प्रदूषित होत असल्याचा दावा जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केला आहे.


पुणे जिल्ह्यातील औद्योगिक वासहतीतील कारखाने, साखर कारखाने लाखों लीटर रसायनमिश्रित सांडपाणी सातत्याने भीमा नदीत सोडले जात आहेत. त्यामुळे उजनी जलाशयातील मासे व इतर जलचर प्राण्यांना तसेच लाखों नागरिकांना या प्रदूषणामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. जलाशयाला जलपर्णीचा विळखा पडत आहे. या गंभीर बाबीकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तब्बल 117 टीएमसी क्षमता असणाऱ्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे 20 टीएमसी पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे लाखो नागरिकांना दुर्धर आजार झाल्याचा गंभीर आरोप जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह राणा (Rajendra Singh Rana) यांनी केला आहे.



पुणे महापालिकेतील पाण्यामुळे धरण प्रदूषित



उजनी धरण (Ujani Dam) परिसरात पाहणी केल्यानंतर त्यांनी सरकारवर ताशेरे ओढत या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले आहे. उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरातील उद्योग आणि महापालिकांचे जवळपास 20 पीएमसी विषारी पाणी मिसळत असल्याने यामुळे धरणातील सर्व 117 टीएमसी पाणी विषारी बनत आहे. या विषारी पाण्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस असणाऱ्या लाखो नागरिकांना याचा फटका बसत असून अनेकांना कॅन्सर आणि त्वचारोगासारखे दुर्धर आजार उद्भवू लागले आहेत. अशावेळी शासनाने याकडे गांभीर्याने पाहून सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केले आहे. (Ujani pollution scary for health)


राजेंद्र सिंह यांनी उजनी धरण परिसरात फिरून पाहणी केल्यावर हे गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी 110 टक्के भरलेले उजनी धरण आता मोकळे होऊ लागले आहे. या ठिकाणी जमिनीवर जे पांढऱ्या रंगाचे आवरण दिसत आहे. ते सर्व उद्योगातून येणाऱ्या विषारी रसायनाचे असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. अशावेळी विकासाच्या गोष्टी करताना पुणे आणि पिंपरी चिंचवड याला एक न्याय व उजनी धरणाखाली असलेल्या शहरांना दुसरा न्याय असे करणे योग्य आहे का असाही सवाल त्यांनी केला आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून