१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा स्पर्धेत ‘एसआरए’ अव्वल

  53

सर्वोत्तम कामगिरी करणारी महामंडळे


१) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण - ८२.१६ गुण
२) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित - ७७.१९ गुण
३) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - ७६.०२ गुण
४) महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण - ६६.३७ गुण
५) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ - ६५.१४ गुण


मुंबई : राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे मूल्यमापन शुक्रवार, दि. १६ मे रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.


१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत संकेतस्थळात सुधारणा, कार्यालयीन सोईसुविधा, स्वच्छता, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी १० मुद्यांवर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमात शासनाच्या अखत्यारीतील सर्व ९५ महामंडळांनी सहभाग घेऊन अभूतपूर्व कामगिरी केली. यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ८२.१६ गुण पटकावून पहिला क्रमांक पटकावला आहे.

Comments
Add Comment

पर्यटन योजनेतून एसटी बसमधून महाराष्ट्र फिरा

प्रवास, जेवण, निवास सर्व काही मिळणार माफक दरात मुंबई : तुम्हालाही राज्यभर फिरायचे स्वप्न आहे पण खर्चाचा विचार

राज्यात वीज दर कपातीला एमईआरसीचा हिरवा कंदील

पहिल्यावर्षी १० टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत ५ वर्षांत २६ टक्के वीजदर होणार कमी मुंबई : राज्याच्या

आदित्य ठाकरेची अटक टाळण्यासाठी हैद्राबादवरुन आणला मांत्रिक!

शिवसेना नेते रामदास कदम यांचा आरोप मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आता काळी विद्या, जादूटोणा आणि तांत्रिक

Numerology: वयाच्या ३५ वर्षानंतर प्रचंड संपत्ती मिळवतात या ३ तारखांना जन्मलेले लोक

मुंबई: अंकज्योतिषामध्ये प्रत्येक अंकाचे खास महत्त्व आहे. १ ते ९ अंकांचा संबंध ग्रह, राशी आणि नक्षत्रांशी जोडलेला

गावा गावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद - क्रीडा मंत्री

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्रात अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत. त्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच

वाढीव मतदानासंदर्भातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालयाचा प्रकाश आंबेडकरांना धक्का मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी