BCCI च्या निर्णयामुळे कोलकाताचे क्रिकेटप्रेमी भडकले

कोलकाता : भारत - पाकिस्तान संघर्षामुळे काही दिवसांसाठी स्थगित केलेली आयपीएल २०२५ ही क्रिकेट स्पर्धा आज म्हणजेच शनिवार १७ मे पासून पुन्हा सुरू होत आहे. आज बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना रंगणार आहे. हा सामना सुरू होण्याआधीच आयपीएलमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. आधीच्या नियोजनानुसार कोलकाता येथे अंतिम सामना होणार होता. पण आता नव्या वेळापत्रकानुसार अंतिम सामना कोलकाता ऐवजी देशातील दुसऱ्या एखाद्या मोठ्या स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी स्टेडियम क्वालिफायर २ आणि अंतिम सामन्यासाठी निवडले आहे. हे दोन्ही सामने अनुक्रमे एक आणि तीन जून रोजी होणार आहेत. यामुळे वादाला तोंड फुटले आहे. कोलकाताचे क्रिकेटप्रेमी अंतिम सामना ईडन गार्डन स्टेडियम येथेच व्हावा यासाठी आग्रही आहेत आणि आंदोलन करत आहेत. बीसीसीआयने अद्याप दोन्ही क्वालिफायर मॅच (पात्रता फेरीचे सामने), एलिमिनेटर (बाद फेरीचा सामना) आणि अंतिम सामना कुठे खेळवणार हे जाहीर केलेले नाही. पण आधीच सामन्यांच्या ठिकाणांवरुन वादाला तोंड फुटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली आणि पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला. आता हा सामना नव्याने २४ मे रोजी खेळवला जाणार आहे. आधी धरमशाला येथे ८ मे रोजी झालेला सामना अर्धवट स्थितीत थांबवण्यात आला होता. आता २४ मे रोजी हा सामना जयपूर येथे होणार आहे.
Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील