Health: हाय बीपीमुळे तरुणांमध्ये वाढतोय स्ट्रोकचा धोका

मुंबई: बदलती जीवनशैली, कामाचा वाढता ताण, धुम्रपान आणि दारूचे सेवन यामुळे सध्या २२ ते ३० वयोगटातील २५% तरुर्णामध्ये उच्च रक्तदाबाची समस्या दिसून येत आहे. जागितक उच्चदाब दिनाच्या निमित्ताने या समस्येचं गांभीर्य लक्षात घेणे गरजेचं आहे. उच्च रक्तदाबामुळे तरुणांमध्ये कमी वयात स्ट्रोक, हृदयविकार आणि मूत्रपिंडाशी संबंधीत समस्या होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची पातळी संतुलित ठेवण्यासाठी नियमित चाचणी, संतुलित आहार, व्यायाम करणं गरजेचं आहे.


बऱ्याचदा कोणत्याही लक्षणांशिवाय उच्च रक्तदाबाची समस्या विकसित होते, म्हणूनच त्याला "सायलेंट किलर" म्हणून संबोधले जाते. डोकेदुखी, चक्कर येणे, अंधुक दृष्टी, छातीत दुखणे किंवा थकवा ही उच्च रक्तदाबाची लक्षणे आहेत. परंतु, उच्च रक्तदाबाबद्दल वेळीच निदान न झाल्यानं गुतांगुत वाढते. लीलावती रुग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. सी. सी. नायर म्हणाले की, तणाव, करिअर संबंधीत वाढती स्पर्धा आणि वैयक्तिक आव्हानं, धूम्रपान आणि मद्यपानासारख्या सवयीसह तरुणांमध्ये उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढत आहेत. त्याहूनही एक चिंताजनक बाब म्हणजे उच्च रक्तदाब असलेल्या अनेक तरुणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. यामुळे नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.


जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर, कालांतराने तो इतर अवयवांवर परिणाम करू शकतो. तरुणांमधील उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे हृदयरोग, स्ट्रोक, दुष्टी कमजोर होणे आणि मूत्रपिंड निकामी होऊ शकते. दर महिन्याला उपचारासाठी येणाऱ्या १० पैकी ८ तरूण रूग्णांना ताणतणाव किंवा धूम्रपानामुळे उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचं आढळून येत आहे. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मीठाचे सेवन मयांदित करणे, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळणे, धूम्रपान तसेच मद्यपानाचे व्यसन सोडणे, नियमित व्यायाम करणे आणि योगा आणि मेडिटेशन सारख्या पर्यायाने तणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र