एसी लोकलमधून फुकट्या कर्मचाऱ्यांचा प्रवास

  47

मुंबई : मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी चढलेल्या टीसीने इतर प्रवाशांचे तिकीट तपासले पण काहींनी आपण स्टाफ असल्याचे सांगताच त्यांचे तिकीट तपासले गेले नाही. याचा जाब एका प्रवाशाने तिकीट तपासनीसांना विचारता त्यांनी संबंधित प्रवाशांचे ओळखपत्र आणि तिकीट तपासण्याऐवजी प्रवाशालाच उलट उत्तर दिले. तिकीट तपासनीसांची मग्रुरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

एसी लोकलचे तिकीट एकतर सर्वसामान्य लोकलपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यात जर रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगून असा विनातिकीट प्रवास होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दादर अंबरनाथ एसी लोकलमध्ये नुकतीच घडली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास सुरुवात केली. पण सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या चार ते पाच जणांनी स्टाफ असल्याचे सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने त्यांच्याजवळील तिकीट किंवा पास तपासला नाही. विशेष म्हणजे त्यापैकी एकाच्या खिशात एनआरएमयूचे कार्ड होते. हे पाहून तिथे उपस्थित एका प्रवाशाने या प्रवाशांचे तिकीट का तपासले नाहीत? असा जाब टीसीला विचारला. तर टीसीने या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे सोडून प्रवाशालाच उलट
उत्तर दिले.
Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना