एसी लोकलमधून फुकट्या कर्मचाऱ्यांचा प्रवास

मुंबई : मुंबई लोकलमधून रेल्वे कर्मचारी असल्याचे सांगून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचीच प्रचिती देणारी एक घटना मध्य रेल्वेवरील एसी लोकलच्या प्रवासात समोर आली आहे. एसी लोकलमध्ये तिकीट तपासण्यासाठी चढलेल्या टीसीने इतर प्रवाशांचे तिकीट तपासले पण काहींनी आपण स्टाफ असल्याचे सांगताच त्यांचे तिकीट तपासले गेले नाही. याचा जाब एका प्रवाशाने तिकीट तपासनीसांना विचारता त्यांनी संबंधित प्रवाशांचे ओळखपत्र आणि तिकीट तपासण्याऐवजी प्रवाशालाच उलट उत्तर दिले. तिकीट तपासनीसांची मग्रुरी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.

एसी लोकलचे तिकीट एकतर सर्वसामान्य लोकलपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यात जर रेल्वेचे कर्मचारी असल्याचे सांगून असा विनातिकीट प्रवास होत असेल तर नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाच आहेत का? असा सवाल रेल्वे प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दादर अंबरनाथ एसी लोकलमध्ये नुकतीच घडली आहे. या लोकलमध्ये प्रवाशांचे तिकीट तपासण्यासाठी ४ टीसी चढले. प्रवाशांनी तिकीट दाखवण्यास सुरुवात केली. पण सीटवर बसून आरामात प्रवास करणाऱ्या चार ते पाच जणांनी स्टाफ असल्याचे सांगताच तिथे उपस्थित असलेल्या टीसीने त्यांच्याजवळील तिकीट किंवा पास तपासला नाही. विशेष म्हणजे त्यापैकी एकाच्या खिशात एनआरएमयूचे कार्ड होते. हे पाहून तिथे उपस्थित एका प्रवाशाने या प्रवाशांचे तिकीट का तपासले नाहीत? असा जाब टीसीला विचारला. तर टीसीने या प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे सोडून प्रवाशालाच उलट
उत्तर दिले.
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत