मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा ई मेल मिळाल्यापासून मुंबई पोलीस दल हाय अलर्टवर आहे. पोलिसांनी धमकीचा ई मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन - चार दिवसांत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ई मेल मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाला. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.

सायबर पोलीस दोन्ही ई मेल प्रकरणी तपास करत आहेत. अद्याप कुठेही स्फोट झालेला नाही. पोलिसांनी दोन्ही ई मेलचा सेंडर शोधण्याचे प्रयतन सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदबस्त वाढवला आहे.
Comments
Add Comment

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या