मुंबई विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. हा ई मेल मिळाल्यापासून मुंबई पोलीस दल हाय अलर्टवर आहे. पोलिसांनी धमकीचा ई मेल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तीन - चार दिवसांत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी ई मेलद्वारे देण्यात आली आहे. हा धमकीचा ई मेल मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झाला. पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताज महल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे.

सायबर पोलीस दोन्ही ई मेल प्रकरणी तपास करत आहेत. अद्याप कुठेही स्फोट झालेला नाही. पोलिसांनी दोन्ही ई मेलचा सेंडर शोधण्याचे प्रयतन सुरू केले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी बंदबस्त वाढवला आहे.
Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल