Aam Adami Party: दिल्लीत आणखीन एक राजकीय भूकंप! 'आप' ला धक्का, एवढ्या लोकप्रतिनिधींनी दिले राजीनामे, नव्या पक्षाची स्थापना

  62

नवी दिल्ली: दिल्‍ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पार्टीला (AAP) पुन्‍हा एकदा मोठा धक्‍का बसला आहे. दिल्‍लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातील तब्बल १५ लोकप्रतिनिधींनी  राजीनामा दिला असून, लवकरच  नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.


आम आदमी पार्टीच्‍या बंडखोर नेत्यांनी एमसीडीमध्ये एक वेगळा गट स्थापन केला आहे. या नगर नगरसेवकांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असतील.



बंडखोर लोकप्रतिनिधींची नावे


आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमन चंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडे, राजेश कुमार, अनिल राणा, देवेंद्र कुमार, हिमानी जैन यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप बंडखोर नगरसेवकांनी केला आहे. २०२२ मध्ये ते आम आदमी पक्षाच्या तिकिटावर एमसीडीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु एमसीडीमध्ये सत्तेत येऊनही आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व ते सुरळीत चालवू शकले नाही.


 


याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना मुकेश गोयल म्हणाले, "आम्ही इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. आम्ही आपमधून राजीनामा दिला आहे. सत्तेत असूनही, आम्ही दिल्लीच्या जनतेच्या सेवेसाठी काम करू शकलो नाही. अंतर्गत संघर्षांमुळे आम्ही काम करू शकलो नाही. "

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके