Aam Adami Party: दिल्लीत आणखीन एक राजकीय भूकंप! 'आप' ला धक्का, एवढ्या लोकप्रतिनिधींनी दिले राजीनामे, नव्या पक्षाची स्थापना

नवी दिल्ली: दिल्‍ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता आम आदमी पार्टीला (AAP) पुन्‍हा एकदा मोठा धक्‍का बसला आहे. दिल्‍लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षातील तब्बल १५ लोकप्रतिनिधींनी  राजीनामा दिला असून, लवकरच  नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.


आम आदमी पार्टीच्‍या बंडखोर नेत्यांनी एमसीडीमध्ये एक वेगळा गट स्थापन केला आहे. या नगर नगरसेवकांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन इंद्रप्रस्थ विकास पक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मुकेश गोयल पक्षाचे अध्यक्ष असतील.



बंडखोर लोकप्रतिनिधींची नावे


आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये हेमन चंद गोयल, दिनेश भारद्वाज, हिमानी जैन, उषा शर्मा, साहिब कुमार, राखी कुमार, अशोक पांडे, राजेश कुमार, अनिल राणा, देवेंद्र कुमार, हिमानी जैन यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याचा आरोप बंडखोर नगरसेवकांनी केला आहे. २०२२ मध्ये ते आम आदमी पक्षाच्या तिकिटावर एमसीडीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु एमसीडीमध्ये सत्तेत येऊनही आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व ते सुरळीत चालवू शकले नाही.


 


याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना मुकेश गोयल म्हणाले, "आम्ही इंद्रप्रस्थ विकास पक्ष नावाचा एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. आम्ही आपमधून राजीनामा दिला आहे. सत्तेत असूनही, आम्ही दिल्लीच्या जनतेच्या सेवेसाठी काम करू शकलो नाही. अंतर्गत संघर्षांमुळे आम्ही काम करू शकलो नाही. "

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने