विरारकरांचा प्रवास होणार गतिमान

वसईत होणार डबल डेकर पुलाची उभारणी


मुंबई:  मुंबई उपनगरातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. दरम्यान वसई-विरारला सध्या दोनच मार्ग आहेत. येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी तर दुसऱ्या बाजूला रेल्वेवर प्रवास करताना लोकलमध्ये प्रवाशांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे नायगाव-भाईंदर दरम्यानच्या खाडीवर नवा पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. यानुसार आता महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने वसई खाडीवर प्रथमच रोड आणि रेल्वे वाहतुकीसाठी डबल डेकर पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या प्रकल्पामुळे मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान व सुसंगत होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही बहुउद्देशीय योजना उत्तन विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) व मिरा रोड-विरार मेट्रो लाइन १३ या दोन मोठ्या प्रकल्पांना एकत्र आणून पूर्ण केली जाणार आहे. वसई खाडीवर सुमारे पाच कि.मी. लांबीचा हा डबल डेकर पूल उभारण्यात येणार असून, या पुलाच्या वरच्या भागावर मेट्रो मार्ग तर खालच्या स्तरावर आठ लेनचा महामार्ग असणार आहे. डबल डेकर असलेल्या या पुलामुळे केवळ प्रवासच नव्हे, तर औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल.


उत्तर मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिवाय, हा पूल दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेशी थेट जोडला जाणार असल्यामुळे लॉजिस्टिक नेटवर्क अधिक मजबूत होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.. मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि वेळखाऊ प्रवास या समस्यांवर हा प्रकल्प प्रभावी उत्तर ठरणार आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित अंदाजे किंमत ९४ हजार कोटी आहे. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार मिळणार आहे.


महत्त्वाची वैशिष्ट्ये : एकूण लांबी : ४.९८ कि.मी. रुंदी: ३०.६० मीटर वरील स्तर मेट्रो मार्ग (लाइन १३) खालपा सार आठ लेन महामार्ग मुख्य निधीपुरवठा : णेआयसीए कार्यान्वयन संस्था एमएमआरडीए

Comments
Add Comment

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात हवामान बदलले; रविवारी काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने चांगलीच विश्रांती घेतली आहे. राज्यातील अनेक भागांत

Bhuleshwar Ganpati Incident : मुंबईत २२ फूट उंच गणेशमूर्ती कोसळली; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी

मुंबई : मुंबईच्या दक्षिण मुंबईतील भुलेश्वर परिसरात गणेशमूर्तीच्या आगमनादरम्यान मोठा अपघात झाला. तब्बल २२ फूट

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन