मुंबईत मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाईनवर मोबाईलला सिग्नल मिळेना, नेटवर्क गायब

  11

मुंबई : मुंबईत मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाईनवर मोबाईलला सिग्नल मिळत नाही, नेटवर्क गायब आहे, इंटरनेट अभावी यूपीआयचा पर्याय वापरता येत नाही; अशा तक्रारी प्रवासी करू लागले आहेत. ही समस्या तीन - चार दिवसांपासून जाणवत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व प्रमुख सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहकांनी भूमिगत मेट्रो स्थानकावर आल्यापासून ते तिथून बाहेर पडून रस्त्यावर येईपर्यंत समस्या जाणवत असल्याची तक्रार केली आहे.


मेट्रो ३ अ‍ॅक्वा लाईनचा विस्तार झाला आहे. आता आरे जेव्हीएलआर ते वरळीतील आचार्य अत्रे चौकापर्यंत ही मेट्रो सेवा उपलब्ध आहे. पण मार्गाचा विस्तार झाला आणि मोबाईल धारकांच्या तक्रारी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही समस्या निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.


समस्येवर उपाय शोधण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टेलिकॉम सेवा देणाऱ्या कंपन्या यांच्यात चर्चा सुरू आहे. पण अद्याप समस्या सुटलेली नाही. यामुळे मेट्रो प्रवाशांचे हाल होत आहेत. तिकीट काढताना यूपीआयचा पर्याय वापरता येत नाही. मेट्रो प्रवासात मोबाईलद्वारे संवाद साधणे अशक्य होते. भूमिगत मेट्रोच्या स्थानकात अथवा भूमिगत मेट्रोत असताना प्रवासी संपर्क क्षेत्राबाहेर जातात. या समस्येवर तातडीने उपाय करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Gold Loan News: सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी आता सोने तारण कर्ज अधिक मिळणार आरबीआयच्या 'या ' निर्णयानंतर कर्जदारांची दिवाळी

प्रतिनिधी: सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. छोट्या छोट्या लघू कर्जदारासाठी आरबीआयने सरलतेचे दरवाजे

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

नीना कुलकर्णी व सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार मुंबई : दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या

आता मुंबईत किनारा मार्गावर मिळणार थांबा

पालिकेकडून 'या' चार जागांची निवड मुंबई : मरिन ड्राइव्ह ते वरळी ते वांद्रे वरळी सी लिंकपर्यंतच्या मुंबई सागरी

दादर केळुस्कर मार्गाच्या काँक्रिटीकरणाची कामे रद्द

मनसे, रहिवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचा निर्णय मुंबई (खास प्रतिनिधी): दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान