पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी उपग्रह अंतराळात पाठवणार

श्रीहरिकोटा : तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारत रविवारी एक उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटमधून हा उपग्रह अंतराळात पाठवला जाणार आहे. हे पीएसएलव्हीचे ६३ वे आणि इस्रोच्या रॉकेटचे १०१ वे प्रक्षेपण आहे. इस्रोच्या नियोजनानुसार रविवार १८ मे रोजी सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे.



प्रक्षेपण प्रक्रियेचा भाग म्हणून पीएसएलव्हीला पेलोड इंटिग्रेशन फॅसिलिटीमधून श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरील मोबाईल सर्व्हिस टॉवरमध्ये पुढील टप्प्यासाठी आणण्यात आले आहे.



इस्रोचा EOS-09 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या देखरेखीच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अॅपार्चर रडारने सुसज्ज आहे ज्यामुळे कोणत्याही वातावरणात २४ तास उच्च क्षमतेचे अर्थात हाय रिझोल्युशनचे फोटो घेणे या उपग्रहाला शक्य आहे.
Comments
Add Comment

PM Narendra Modi : ‘होर्मुझ सामुद्रधुनीत अडथळा अस्वीकार्य’; लोकसभेत पंतप्रधान मोदींचा जगाला स्पष्ट संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणाव आणि युद्धस्थितीवर लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करताना

एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचा पश्चिम आशियासाठी ३० विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, अनेक विमान कंपन्यांना पश्चिम आशियाई देशांमधील

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएची काश्मिरात छापेमारी

श्रीनगर : दिल्लीतील लाल किला स्फोट प्रकरणाच्या तपासात राष्ट्रीय जांच एजेंसी (एनआयए) ने आज, सोमवारी पहाटे काश्मीर

धक्कादायक! भारतीय वायुसेना कर्मचारी करत होता पाकिस्तानसाठी हेरगिरी; आसाममधून अटक

वायुसेना आणि राजस्थान गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने आसाममधील वायुसेना तळावर कार्यरत असलेल्या एका

मुस्लिम डॉक्टरने गुंगीचे इंजेक्शन देत केला हिंदू मुलीवर बलात्कार; मध्यप्रदेशातील संतापजनक घटना

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुस्लिम डॉक्टरने एका हिंदू तरुणीवर

भारताने पुन्हा एकदा गाठला एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचा टप्पा

- देशाच्या ऊर्जा सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी भारताने २० मार्च २०२६ रोजी सलग दुसऱ्या वर्षी १ अब्ज टन कोळसा