पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी उपग्रह अंतराळात पाठवणार

श्रीहरिकोटा : तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारत रविवारी एक उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटमधून हा उपग्रह अंतराळात पाठवला जाणार आहे. हे पीएसएलव्हीचे ६३ वे आणि इस्रोच्या रॉकेटचे १०१ वे प्रक्षेपण आहे. इस्रोच्या नियोजनानुसार रविवार १८ मे रोजी सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे.



प्रक्षेपण प्रक्रियेचा भाग म्हणून पीएसएलव्हीला पेलोड इंटिग्रेशन फॅसिलिटीमधून श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरील मोबाईल सर्व्हिस टॉवरमध्ये पुढील टप्प्यासाठी आणण्यात आले आहे.



इस्रोचा EOS-09 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या देखरेखीच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अॅपार्चर रडारने सुसज्ज आहे ज्यामुळे कोणत्याही वातावरणात २४ तास उच्च क्षमतेचे अर्थात हाय रिझोल्युशनचे फोटो घेणे या उपग्रहाला शक्य आहे.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे