पाकिस्तानवर लक्ष ठेवण्यासाठी रविवारी उपग्रह अंतराळात पाठवणार

  61

श्रीहरिकोटा : तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी भारत रविवारी एक उपग्रह अंतराळात पाठवणार आहे. पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटमधून हा उपग्रह अंतराळात पाठवला जाणार आहे. हे पीएसएलव्हीचे ६३ वे आणि इस्रोच्या रॉकेटचे १०१ वे प्रक्षेपण आहे. इस्रोच्या नियोजनानुसार रविवार १८ मे रोजी सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही - सी ६१ रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे.



प्रक्षेपण प्रक्रियेचा भाग म्हणून पीएसएलव्हीला पेलोड इंटिग्रेशन फॅसिलिटीमधून श्रीहरिकोटा येथील स्पेसपोर्टवरील मोबाईल सर्व्हिस टॉवरमध्ये पुढील टप्प्यासाठी आणण्यात आले आहे.



इस्रोचा EOS-09 हा एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा उपग्रह कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही परिस्थितीत भारताच्या देखरेखीच्या क्षमतेत वाढ करणार आहे. यामुळे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. हा उपग्रह सी-बँड सिंथेटिक अॅपार्चर रडारने सुसज्ज आहे ज्यामुळे कोणत्याही वातावरणात २४ तास उच्च क्षमतेचे अर्थात हाय रिझोल्युशनचे फोटो घेणे या उपग्रहाला शक्य आहे.
Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या