मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात ड्रोन उडविण्यास बंदी, प्री वेडिंग आणि लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंगदेखील अडचणीत

ठाणे: मुंबई आणि नवीन मुंबई पाठोपाठ ठाणे शहरात देखील ड्रोन उडविण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाणे शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता भंग होवू नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आले आहे. मुंबई आणि नवी मुंबईत देखील याप्रकारे बंदी घालण्यात आली आहे.


ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाने याबाबत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणे उडविण्यास मनाई असेल. हा आदेश दि.14 मे 2025 पासून लागू झाला असून दि.3 जून 2025 पर्यंत तो अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 आणि इतर लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य आणि तातडी लक्षात घेवून हा आदेश तातडीने लागू करण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. उपायुक्त (मुख्यालय-1), विशेष शाखा, ठाणे शहर, डॉ.श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत.



प्री वेडिंग आणि लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंगदेखील बंद


भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे ड्रोनची दहशत सर्वांच्या मनात आहे. ठाणे आणि मुंबईत मोठमोठ्या इमारती असल्याने या शहरांत ड्रोन हल्ल्याचा अधिक धोका आहे. त्यामुळे पोलिसांकडून ड्रोन, पॅराशूट, पॅराग्लायडिंग या सर्वावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी काही लोकांकडून विनापरवानगी ड्रोन उडविले जात आहेत. मुंबईत आठवड्याभरात पोलिसांनी ड्रोन उडविणाऱ्यांवर आठ ते दहा गुन्हें दाखल केले आहेत. या बंदीमुळे प्री वेडिंग तसेच, लग्न सोहळ्यातील ड्रोन शूटिंग अडचणीत आले आहे. पोलिसांची बंदी घुडकावून असे चित्रिकरण करणाऱ्या ड्रोन ऑपरेटरवरही गुन्हे दाखल केले जात आहेत.

Comments
Add Comment

साखरेचे सेवन नियंत्रित केल्यास शरीराला होतील 'हे' फायदे!

अनेक भारतीय घरांमध्ये सकाळची सुरुवात चहाने किंवा कॉफीने होते. त्यामुळे दिवसाची सुरुवातच साखरेने होते. साखर

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

'ठरलं तर मग' मालिकेत आजीची भूमिका साकारणार रोहिणी हट्टंगडी

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

दिव्यांच्या उजेडात नवी उमेद, नवा आनंद, दिवाळी सणानिमित्त पाठवा खास शुभेच्छा

दिवाळी २०२५ च्या मराठी शुभेच्छा: हिंदू धर्मामध्ये दीपोत्सवाला अत्यंत महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून ते

इशित ट्रोल झाल्यानंतर पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी मौन सोडलं, नागपूरच्या स्प्रुहाशी संवाद साधना म्हणाले....

मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती १७’ या लोकप्रिय शोचा ज्युनिअर वीक सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. काही

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच