Nagpur Bike Taxi : नागपुरात लवकर सुरु होणार बाईक टॅक्सी!

व्यवसाय करणाऱ्यांसाठी परवाना अनिवार्य


नागपूर : एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी टॅक्सी सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.त्यामुळे आता नागपुरातही बाईक टॅक्सी सुरु होणार आहे.या बाइक इलेक्ट्रिक राहणार असून त्यावर पिवळा रंग असणार आहे. चालकाचे वय २० वर्षांहून अधिक व ५० वर्षांपेक्षा कमी असावे आदी नियमही घालून देण्यात आले आहे.


ज्याला बाइक टॅक्सीचा व्यवसाय करायचा आहे त्या ऍग्रीगेटरकडे किमान ५० इलेक्ट्रिक बाइक असणे आवश्यक आहे. त्याला राज्य परिवहन प्राधिकरण यांच्याकडून एकच परवाना देण्यात येणार आहे. या परवान्याची वैधता ५ वर्षाची असेल. सर्व बाइक पिवळ्या रंगात असाव्यात आणि त्यावर बाइक-टॅक्सी असे लिहिणे, दुचाकी-टॅक्सीवर सेवा-प्रदात्याचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक राहणार आहे. बाइक टॅक्सी चालकाकडे बेंज असण्यासोबतच चालकाचे वय २० वषार्पेक्षा कमी आणि ५० वर्षापेक्षा जास्त नसण्याची अट आहे. त्यामुळे या व्यवसायात तरुणांची संख्या वाढणार आहे. सोबतच दरदिवशी दुचाकी चालविण्याकरिता ८ तासांची मर्यादा असणार आहे.



प्रवाशांसाठी सुरक्षा


प्रवाशांचा सुरक्षतेसाठी बाइक टॅक्सीमधून एकावेळी एकाच प्रवाशाला घेऊन जाता येणार आहे. १२ वर्षाखालील मुलांना प्रवासाकरिता परवानगी नसेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व बाइक टॅक्सींना प्रवासी आणि चालक यांच्यामध्ये विभाजक बसविण्यात येतील. जीपीएस ट्रेकिंग, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, दुचाकी चालक आणि प्रवासी यांकरिता हेल्मेट बंधनकारक असेल. अपघात आणि मृत्यू या दोन्हींकरिताचे विमा संरक्षण सेवा प्रदात्याने उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.



लवकरच दर ठरवणार


काही कालावधीनंतर महिला चालकांचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढवून ते ५० टक्के करण्याची जबाबदारी परवानाधारकाची राहणार आहे. बाइक टॅक्सीकरिता परवानाधारकाने दुचाकी-टॅक्सी स्थानक, चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण दर्शवणे आवश्यक राहणार आहे. बाइक टॅक्सीच्या दराचे नियंत्रण संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून करण्यात येईल. त्यामुळे लवकरच दर ठरविण्यात येईल. नियमात बसणा-या एग्रीगेटरला मान्यता देण्यात येईल. तूर्तास एकही ऍग्रीगेटरने अर्ज केलेला नाही, अशी माहिती विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

साडीच्या ऑफरमुळे महिलांची चेंगराचेंगरी , ३ महिला बेशुद्ध

छत्रपती संभजीनगर : सध्या छत्रपती संभजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एक रीलस्टार ची रील पाहून महिलांनी

Uday Samant : "ठाकरेंचा वचननामा म्हणजे केवळ आश्वासनांची खैरात!" मंत्री उदय सामंतांचा टोला

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी

१५ ते २५ जानेवारीदरम्यान पुणे रेल्वे प्रवासात बदल, कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या

पुणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे रेल्वे विभागाकडून दौंड–मनमाड

पौष पौर्णिमेनिमित्त खंडोबा मंदिराला शिखरी काठ्यांची देवभेट

जेजुरी : पौष पौर्णिमा हा खंडोबाचा लग्नसोहळा दिवस असतो. यानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरावर आज रविवारी दुपारी

हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही; महाराष्ट्रात मराठीचा सन्मान वाढवला जाईल

मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, ती आपली ओळख आणि अस्तित्व “मराठी ही केवळ भाषा नाही, ती आपली ओळख आहे, आपली

लातूरचे नवोदय विद्यालय हादरलं; वसतिगृहात विद्यार्थिनी आढळली मृतावस्थेत

लातूर : लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना