क्षेत्रीय तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम सुरू

मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची माहिती


अलिबाग : पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी १२ मे ते ७ जून २०२५ या कालावधीत जिल्ह्यात क्षेत्रीय तपासणी संचद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व १,८३१ गावांमध्ये ही मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छ, शुद्ध गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलबध करून देण्यात येणार असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली.


पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहिमेतंर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्याबाबतच्या सुचना दिल्या आहेत. या मोहिमेंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवताविषयक एफ.टी.के. प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ.टी.के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, ८ ते १० मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळजोडण्यांमधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्ल्यूएमआयएस पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणीपुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळजोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणीगुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणीगुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार आहे.



दरम्यान, एफ.टी.के. संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीमेमध्ये विविध विभागांचा सहभाग राहील. त्यामध्ये ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा विभागाचा सहभाग राहील. सर्वांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहीम यशस्वी केली जाणार आहे. नागरिकांनी याकामी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहॆ.


काय आहे क्षेत्रीय तपासणी संच?


एफ.टी.के.म्हणजे क्षेत्रीय पाणी तपासणी संच आहे. जे प्राथमिक स्वरूपात पिण्याच्या पाण्यातील रासायनिक आणि जैविक घटकांची तपासणी करण्यासाठी वापरले जाते. यामुळे पाण्याची गुणवत्ता त्वरित ठरविणे, गावपातळीवर नागरिकांना पाण्यातील अशुद्धता ओळखण्यास मदत करणे हा या संचाचा उद्देश आहे. यामध्ये पीएच स्तर, क्लोरीन, नायट्रेट, क्लोराइड, क्लोराईड, लोह, अल्कलिनिटी, गढुळपणा, हार्डनेस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, तसेच जैविक प्रदूषणाबाबत तपासणी केली जाते. याचा प्राथमिक स्तरावर लगेच निकाल मिळतो. या संचाद्वारे पाणीपुरवठा स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व घरगुती नळजोडण्याची पाणी गुणवत्ता तपासली जाणार आहे.

Comments
Add Comment

नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन या दिवशी होणार पहिले उड्डाण ?

पनेवल : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबर २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. यानंतर

पाली नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता

विजयाने पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा जल्लोष गौसखान पठाण सुधागड-पाली : अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली

रस्त्यावर खड्डेच खड्डे, मग पोलिसांनी असं काही केलं की...

रायगड : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेलजवळील पळस्पे फाटा परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय करत

कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी फेऱ्या बंद

खेडोपाड्यातील प्रवाशांचे प्रचंड हाल महाड : गणेशोत्सव संपताच कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून,

मध्यरात्री CNG दरवाढीनंतर पंप अर्धा तास बंद, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रायगड : मध्यरात्री अचानक सीएनजी दरवाढीचा फटका बसल्याने रायगड जिल्ह्यासह मुंबई–गोवा महामार्गावरील विविध सीएनजी

पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना नवी मुंबईत प्रवेश बंदी

पनवेल (वार्ताहर):मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे पुकारलेल्या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणारे सगळेच महामार्ग