रेवस - रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती

नव्या रेवदंडा - साळाव पुलासाठी १२५० कोटींचा निधी मंजूर


अलिबाग : रेवस-रेड्डी सागरी मार्गावरील आणखी एका पुलाच्या कामाला गती मिळणार असून, रेवदंडा-साळाव दरम्यानच्या नवीन पुलाचे काम गुरुवारपासून सुरू झाले आहे. अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने रेवस-करंजा पाठोपाठ आता रेवदंडा-साळाव पुलाच्या कामालाही सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कोकणातील सागरी मार्गावरील सात पुलांच्या राज्य सरकारने मंजुरी दिली होती. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या पुलांचे काम केले जाणार होते.


तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या पुलांच्या कामांचा भूमिपुजन सोहळा पार पडला होता. मात्र, रेवस-करंजा पुलाचा अपवाद सोडल्यास इतर पुलांच्या कामाला सुरुवात होऊ शकली नव्हती. आता मात्र रेवदंडा ते साळाव दरम्यानच्या पुलाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. अशोका बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन लि. कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे.
रेवस-रेड्डी सागरी महामार्ग निर्मितीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या कुंडलिका खाडीवरील रेवदंडा-साळाव पुलासाठी १ हजार २५० कोटी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंनी यांनी १९८० काळात सागरी महामार्गाची संकल्पना मांडली होती.


मात्र या पुलांची कामे रखडल्याने हा सागरी महामार्ग अस्तित्वात येऊ शकला नव्हता. आता चार दशकांच्या प्रतिक्षेनंतर या कामाला गती मिळणार आहे. राज्य सरकारने रेवस-रेड्डी मार्गाच्या सुधारित आराखड्याला मंजुरी दिली असून, यासाठी साडेनऊ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पाच टप्प्यात रस्त्याचे काम होणार आहे. या सागरी मार्गामुळे किनाऱ्यालगतची शहरे मुख्य रस्त्याशी जोडली जाणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे मुंबई ते गोवा हे अंतरही कमी होणार आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या आराखड्यात १६५ किलोमीटर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार असून, तर उर्वरित मार्ग हा दुपदरी असणार आहे. आधीच्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग तयार केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत. यासाठी काही, तसेच चौपदरीकरणाच्या टप्प्यासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. सागरी मार्गावर खाड्यांवर अत्याधुनिक पद्धतीच्या पुलांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे मुंबई ते गोवा हे अंतर कमी होऊन पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर ९ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Nashik : मडक्यात सापडला ‘गावठी कट्टा’; पोलिसांच्या तपासानंतर मात्र वेगळंच सत्य समोर

Nashik : सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात एका घराबाहेर ठेवलेल्या रिकाम्या पाण्याच्या मडक्यात बंदुकीसारखी वस्तू

Salman Khan : ॲनिमे प्रिंटपासून पॅचवर्क पँट्सपर्यंत... सलमान खानने आपल्या हटके ट्राउझर्सद्वारे निर्माण केला नवा फॅशन ट्रेंड!

Salman Khan : फॅशन (Fashion) , लाईफस्टाईल (Lifestyle) अन अॅक्टींग (Acting) पहावी ती सलमान खानचीच (Salman Khan) असे सलमान प्रेमी म्हणजेच भाईप्रेमी

Ek Hota Malin : एका रात्रीत अख्खं गाव मातीखाली गाडलं गेलं... अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर प्रदर्शित

Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

Ahilyanagar : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना 65 जण रंगेहाथ ताब्यात; पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ

Ahilyanagar : जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठी धडक

Bollywood movies : जुलैमध्ये बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाचा भडका ; 'अल्फा' ते 'धमाल 4'सह या 7 हिंदी चित्रपटांचा तडका

Bollywood movies : तुम्ही चित्रपट प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे. चित्रपटप्रेमींसाठी जुलै महिना मनोरंजनाची