महाराष्ट्रातील धरणांमध्ये फक्त २८ टक्के पाणीसाठा

मुंबई : उकाड्याने राज्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने उपलब्ध जलसाठ्याची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रमुख धरणांमध्ये २८.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये या कालावधीत २३.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा उपलब्ध आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.


सर्वाधिक ३८.१३ टक्के पाणीसाठा अमरावती येथील धरणांत आहे.कोकणातील धरणांमध्ये ३४.१५ टक्के, नागपूर येथील धरणांमध्ये ३२.७९ टक्के पाणीसाठा, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये ३१.२३ टक्के, नाशिकच्या धरणांमध्ये ३१.३५ टक्के तर पुण्यातील धरणांमध्ये २१.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये १४,२५३.३६ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा उरला आहे. त्यापैकी ८,१६६.१७ दशलक्ष घनमीटर एवढाच उपयुक्त पाणीसाठा आहे.


नागपूर येथील धरणांमध्ये ११३५.४ दशलक्ष घनमीटर, अमरावतीच्या धरणांमध्ये ९०१.४१ दशलक्ष घनमीटर, छत्रपती संभाजीनगरच्या धरणांमध्ये १४०३.८२ दशलक्ष घनमीटर, नाशिकच्या धरणांमध्ये ११६९.५६ दशलक्ष घनमीटर, पुण्याच्या धरणांमध्ये २६७८.३२ दशलक्ष घनमीटर, कोकणातील धरणांमध्ये ८७७.६६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे.


महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सात धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३७७ दशलक्ष लिटर आहे. या धरणांच्या तलावांतून मुंबईला दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. सध्या मुंबईला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणांच्या जलाशयांमध्ये १९.१७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच तारखेला हा साठा १३.६३ टक्के होता.


नाशिक जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये १८ हजार ६२४ दशलक्ष घनफूट अर्थात २८.३६ टक्के जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २५०० दशलक्ष घनफूट अर्थात ४४.४० टक्के जलसाठा आहे. कश्यपीत ६५९ घनफूट अर्थात ३५.५८ टक्के, गौतमी गोदावरीत १६९ घनफूट अर्थात नऊ टक्के, आळंदीत १०३ घनफूट अर्थात १२.६२ टक्के जलसाठा आहे. माणिकपुंज हे धरण कोरडेठाक झाले आहे. इतर आठ धरणांमधील पाणीसाठा अल्प झाला आहे.


महाराष्ट्रातील सर्व मध्यम आकाराच्या धरणांमध्ये ३८.९८ टक्के तर लघू आकाराच्या धरणांमध्ये ३१.५५ टक्के तर महाराष्ट्र राज्य प्रकल्पातील धरणांमध्ये २९.९४ टक्के पाणीसाठा आहे.

Comments
Add Comment

New Navi Mumbai-Sindhudurg flight service : नवी मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक; 'फ्लाय-९१' विमान कंपनी देणार सेवा MUMBAI : नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग दरम्यानची

Bhayander Illegal Mosque Demolished : मीरा-भाईंदरमध्ये मोठी कारवाई; अनधिकृत मशीद पाडली, परिसरात तणावपूर्ण शांतता

मीरा-भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील भाईंदर पूर्व येथील आझादनगर परिसरात आज सकाळी मोठी कारवाई करण्यात

Suryakumar Yadav : टीम इंडियानंतर आता मुंबई इंडियन्सची साथही सोडणार? सूर्यकुमार यादवच्या भविष्याबाबत चर्चांना उधाण

MUMBAI: भारतीय क्रिकेट संघाच्या टी-20 कर्णधारपदावरून हटवल्यानंतर आणि आगामी आयर्लंड व इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय

Suicide News : अटल सेतूवरून तरुणाची समुद्रात उडी; युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) एका २८ वर्षीय तरुणाने समुद्रात उडी मारल्याची धक्कादायक

Dadar Bus Accident : दादरमध्ये भीषण अपघात! भरधाव बसचा कहर; ३ बाईक, टॅक्सी आणि ओला-उबेरला धडक, एकाचा मृत्यू, अनेक जखमी

मुंबई : दादर येथील प्लाझा परिसरात सोमवारी भीषण अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली. भरधाव वेगाने आलेल्या एका बसने तीन

MahaDBT Students Scheme : मोठ्या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ३० हजार रुपये मिळणार; कोण पात्र? जाणून घ्या

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर किंवा छत्रपती संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये उच्च शिक्षण (Higher Education) घेणे अनेक