ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार

मुंबई : शहरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. शहरातील विविध भागांत मेट्रोच्या कामांना जोर आला आहे. वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो-११ साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. समुद्राचे पाणी नेमके किती खोलीवर आहे, हे तपासण्यासाठी जागोजागी ड्रीलिंगचे काम सुरू झाले आहे. या मेट्रोमुळे ठाणेकरांना थेट सीएसएमटीला पोहोचता येणार आहे.


वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो ११ ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो ४ अ आणि मेट्रो ४ ची विस्तारित मार्गिका आहे. ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी (सीएसएमटी) जोडण्यासाठी या मार्गिकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मार्गिका सीएसएमटीहून पुढे सर्कलखालून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समुद्राच्या पाण्याचा अभ्यास केला जात आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते अपोलो बंदर या भागाचाच भू तंत्र तपासाच्याआधारे भूगर्भाचा अभ्यास केला जात आहे. या भागात जमिनीखाली समुद्राचे पाणी असण्याची शक्यता आहे, हे पाणी नेमक्या किती खोलीवर याचा अभ्यास होत आहे. त्यासाठी दर ५०० मीटर अंतरावर दीड ते तीन मीटर खोल खड्डे खणले जात आहेत.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Travel Outfits : प्रवासात कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही हवे? ट्राय करा हे ८ ट्रेंडी आउटफिट्स

लांबचा प्रवास असो किंवा विकेंड ट्रिप, स्टायलिश दिसतानाच आरामदायी कपडे घालणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य

Water Worship : तब्बल चार वर्षानंतर महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलपूजन

नाशिक : नाशिक महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर गंगापूर धरणातील जलपूजनाचा

Special Intensive Revision : विशेष सखोल पुनरिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात चिपळूण राज्यात प्रथम

रत्नागिरी : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे काम १०० टक्के पूर्ण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील ‘२६५ –

Ladoo : राष्ट्रीय पुरस्कार विजेते शैलेंद्र सिंग यांचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण; सत्य घटनेवर आधारित 'लाडू' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीत तब्बल २५ वर्षांचा सुवर्णकाळ गाजवणारे, ७२ वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती

Night Walk : रात्रीच्या जेवणानंतर शतपावली किती महत्त्वाची?

शरीर निरोगी ठेवण्यासाठी अनेक लोक सकाळी व्यायाम आणि Morning Walk करतात. यामुळे नक्कीच शरीराला फायदे होतात यात काही शंका