ठाणेकरांना थेट सीएसएमटी गाठता येणार

  48

मुंबई : शहरात मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. शहरातील विविध भागांत मेट्रोच्या कामांना जोर आला आहे. वडाळा ते अपोलो बंदर या भुयारी मेट्रो-११ साठी भूगर्भातील समुद्राचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. समुद्राचे पाणी नेमके किती खोलीवर आहे, हे तपासण्यासाठी जागोजागी ड्रीलिंगचे काम सुरू झाले आहे. या मेट्रोमुळे ठाणेकरांना थेट सीएसएमटीला पोहोचता येणार आहे.


वडाळा ते अपोलो बंदर मेट्रो ११ ही ठाण्यातील गायमुख ते वडाळा या मेट्रो ४ अ आणि मेट्रो ४ ची विस्तारित मार्गिका आहे. ठाण्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसशी (सीएसएमटी) जोडण्यासाठी या मार्गिकचे नियोजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही मार्गिका सीएसएमटीहून पुढे सर्कलखालून अपोलो बंदरपर्यंत नेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टीने समुद्राच्या पाण्याचा अभ्यास केला जात आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी ते अपोलो बंदर या भागाचाच भू तंत्र तपासाच्याआधारे भूगर्भाचा अभ्यास केला जात आहे. या भागात जमिनीखाली समुद्राचे पाणी असण्याची शक्यता आहे, हे पाणी नेमक्या किती खोलीवर याचा अभ्यास होत आहे. त्यासाठी दर ५०० मीटर अंतरावर दीड ते तीन मीटर खोल खड्डे खणले जात आहेत.

Comments
Add Comment

E-buses in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात लवकरच एसटीच्या ताफ्यात ई-बसेस

रत्नागिरी: एसटी महामंडळाने प्रदूषण आणि डिझेलच्या वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचा एसटी

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी