रोहित-कोहलीऐवजी टीम इंडियाला मिळाले ‘नवे तगडे हिरो’

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन दिग्गज खेळाडूंनी कसोटीतून निवृत्तीची घोषणा केल्याने भारतीय क्रिकेट संघाला कसोटी क्रिकेटमध्ये मोठा धक्का बसला होता. या दोघांची जबाबदारी आता कोण पार पाडणार? ही बीसीसीआयची डोकेदुखी आता संपलीय, कारण त्यांच्या जागी दोन नवे दमदार खेळाडू उभे राहण्याची शक्यता आहे.



कसोटी संघात नव्या दमाचे चेहरे - ईश्वरन आणि सरफराज सज्ज!


२० जूनपासून इंग्लंडविरुद्ध सुरु होणा-या (India vs Eng Test Series) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खान या दोन फलंदाजांचे नाव चर्चेत आहे. दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रचंड सातत्याने चमकले आहेत.



अभिमन्यू ईश्वरन सलामीवीर म्हणून सिद्ध


बंगालकडून खेळणारा उजव्या हाताचा सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०१ सामने खेळत तब्बल ७६७४ धावा केल्या आहेत. २७ शतके, २९ अर्धशतके आणि ४८.८७ चा सरासरीचा आकडा ही त्याच्या स्थैर्याची साक्ष देते. बिहारविरुद्ध खेळलेली २३३ धावांची खेळी त्याच्या कारकिर्दीतील खास कामगिरी ठरली होती.


रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर सलामीच्या जागेसाठी ईश्वरन हा सर्वात प्रबळ पर्याय मानला जातो.



सरफराज खान मधल्या फळीतला नवा विश्वास


महाराष्ट्राचा सरफराज खान हा काहीसा उशिरा, पण लक्षणीय एन्ट्री घेणारा फलंदाज ठरला आहे. भारतासाठी आतापर्यंत ६ सामने, ११ डावांत ३७१ धावा, एक शतक, तीन अर्धशतके आणि ३७.१० चा सरासरीचा आकडा म्हणजे आश्वासक सुरुवात. त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे १५०.


विराट कोहलीच्या चौथ्या क्रमांकावर सरफराजला उतरवल्यास तो संघासाठी मोलाची भूमिका बजावू शकतो.



बीसीसीआयकडून लवकरच घोषणा शक्य!


भारत-इंग्लंड कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा लवकरच होणार असून, ईश्वरन आणि सरफराजला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. आता निवड समिती काय निर्णय घेते आणि देशांतर्गत कामगिरीचा विचार करून हे दोघं नव्या युगाची सुरुवात करतील का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो