स्वप्न साकार होणार, महामुंबईत हक्काचं घर होणार

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जागेचे दर गगनाला भिडू लागले आहेत. चांगल्या परिसरात घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे अनेकांसाठी आवाक्याबाहेरचे होऊ लागले आहे. अशा नागरिकांचे मुंबईजवळ हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाचा कोकण विभाग सरसावला आहे. लवकरच म्हाडा कोकण विभाग घरांची सोडत काढणार आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचा कोकण विभाग म्हणजेच म्हाडा कोकण जुलै २०२५ मध्ये चार हजार घरांची सोडत काढण्याची तयारी करत आहे. या सोडतीतील अर्थात लॉटरीतील किमान एक हजार घरं ही ठाण्यातील चितळसर भागात आहेत. कल्याणमध्येही शेकडो घरांचा पर्याय या सोडतीमुळे उपलब्ध होणार आहे.

याआधी २०२४ मध्ये म्हाडा मुंबईची सोडत निघाली होती. आता म्हाडा कोकणची सोडत निघणार आहे. जुलै महिन्यात कोकण विभाग कल्याण आणि ठाणे शहरांसाठी सोडत जाहीर करेल. म्हाडाच्या कोकण मंडळाने गेल्या दीड वर्षात तीन सोडती काढल्या. याद्वारे सुमारे दहा हजार लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता जुलै २०२५ मध्ये म्हाडा कोकण काढणार असलेल्या सोडतीमुळे हजारो नागरिकांचे मुंबई जवळ हक्काचे घर घेण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

म्हाडाने महाराष्ट्रात २०२५ - २६ या आर्थिक वर्षात १९ हजार ४९७ घरे बांधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. यात मुंबईतील पाच हजार १९९ घरांचा समावेश आहे. यामुळे घर खरेदी करण्याच्या प्रतीक्षेत लोकांना दिलासा मिळण्यास मदत होईल. म्हाडा कोकणात नऊ हजार ९०२, पुण्यात १८३६, नागपूरमध्ये ६९२, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६०८, नाशिकमध्ये ९१, अमरावतीत १६९ घरे बांधण्याचे उद्दीष्ट डोळ्यांपुढे ठेवून काम करत आहे. म्हाडाने मुंबईतील घरांसाठी ५७४९.४९ कोटी, कोकणातील घरांसाठी १४०८.८५ कोटी, पुण्यातील घरांसाठी ५८५, नागपूरच्या घरांसाठी १००९ कोटी, छत्रपती संभाजीनगरमधील घरांसाठी ६५.९६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
Comments
Add Comment

मुक्त शिक्षण प्रणालीमुळे शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यास मदत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

'एज्युकेट गर्ल्स' संस्थेसोबत शासनाचा सामंजस्य करार मुंबई : राज्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू

CSR डॅशबोर्ड सुरू करा, मुंबई महापालिकेकडे आमदार साटमांची मागणी

दानशूर संस्था व नागरिकांना योगदान देण्यासाठी प्लॅटफॉर्म उभारण्याचा प्रस्ताव, आमदार अमीत साटम यांचे महापौर

शाहरुख, सलमानला भेटा, ५० रुपयांत वांद्रयात फिरा

सध्या सगळीकडेच महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेकांना वाटतं की मुंबईत फिरणं म्हणजे आपल्याला काही परवडणार

Mumbai: चेंबूरमधील संतापजनक घटना; एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई: मुंबईत एक संतापजनक घटना समोर आली आहे. चेंबूरच्या टिळक नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर