भुजबळांची तोफ शुक्रवारी धडाडणार! ओबीसी आरक्षण आणि जातगणनेवर काय बोलणार?

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळांची जळजळीत तोफ धडाडणार आहे.


भुजबळ यांचे भाषण ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७% आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापले आहे.



त्यातच केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला जातगणनेचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतोय. गेल्या दशकभरापासून भुजबळ जातगणनेसाठी देशभरात आवाज उठवत आले आहेत. न्यायालयीन लढा असो वा संसदबाहेरील आंदोलन, भुजबळांचा पाठपुरावा थांबलेला नाही. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तर जातीय जनगणनेसाठी संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवला आहे.


समता परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय विकासाचे आराखडे तयार करण्यासाठीची मागणी त्यांनी सातत्याने पुढे रेटली आहे.


आता या दोन्ही विषयांवर भुजबळ वसंत व्याख्यानमालेत काय ठाम भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान