भुजबळांची तोफ शुक्रवारी धडाडणार! ओबीसी आरक्षण आणि जातगणनेवर काय बोलणार?

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळांची जळजळीत तोफ धडाडणार आहे.


भुजबळ यांचे भाषण ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७% आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापले आहे.



त्यातच केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला जातगणनेचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतोय. गेल्या दशकभरापासून भुजबळ जातगणनेसाठी देशभरात आवाज उठवत आले आहेत. न्यायालयीन लढा असो वा संसदबाहेरील आंदोलन, भुजबळांचा पाठपुरावा थांबलेला नाही. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तर जातीय जनगणनेसाठी संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवला आहे.


समता परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय विकासाचे आराखडे तयार करण्यासाठीची मागणी त्यांनी सातत्याने पुढे रेटली आहे.


आता या दोन्ही विषयांवर भुजबळ वसंत व्याख्यानमालेत काय ठाम भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

ताडोबातल्या तारा वाघीणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी केलेले एक काम संजय राऊतांनी दाखवावे

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचे थेट आव्हान उद्धव ठाकरे आणि उबाटा गट यांनी मराठी माणसाच्या हितासाठी काय

१६ जानेवारीला आपण अटलजींना खरी आदरांजली द्यायची आहे" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज संपूर्ण देशभरात अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. या निमित्त भाजपा