भुजबळांची तोफ शुक्रवारी धडाडणार! ओबीसी आरक्षण आणि जातगणनेवर काय बोलणार?

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळांची जळजळीत तोफ धडाडणार आहे.


भुजबळ यांचे भाषण ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७% आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापले आहे.



त्यातच केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला जातगणनेचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतोय. गेल्या दशकभरापासून भुजबळ जातगणनेसाठी देशभरात आवाज उठवत आले आहेत. न्यायालयीन लढा असो वा संसदबाहेरील आंदोलन, भुजबळांचा पाठपुरावा थांबलेला नाही. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तर जातीय जनगणनेसाठी संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवला आहे.


समता परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय विकासाचे आराखडे तयार करण्यासाठीची मागणी त्यांनी सातत्याने पुढे रेटली आहे.


आता या दोन्ही विषयांवर भुजबळ वसंत व्याख्यानमालेत काय ठाम भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

चंद्रपूर-यवतमाळ एसटीला अपघात

करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर

सुशोभिकरणाच्या कामांसाठी पुन्हा प्रशासनाने केला हात ढिला

माटुंगा,वडाळ्यातील कामांसाठी प्रलंबित बिलांचा मार्ग मोकळा मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेने हाती

मुंबई महापालिकेत ढाकणे आले, सैनी गेले

अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांची नियुक्ती मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ अमित

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्या प्रकरणी ‘एसआयटी’ स्थापन

मुंबई : मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जे यांच्या आत्महत्येच्या

तक्रार येईपर्यंत थांबू नका, मतदारयादीतील चुका स्वतःहून दुरुस्त करा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या मतदारयाद्या अचूक असाव्यात, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व