भुजबळांची तोफ शुक्रवारी धडाडणार! ओबीसी आरक्षण आणि जातगणनेवर काय बोलणार?

नाशिक : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आता पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. १६ मे रोजी संध्याकाळी ७:१५ वाजता गोदाघाट येथील देवमामलेदार यशवंत महाराज पटांगणात, वसंत व्याख्यानमालेच्या १६व्या पुष्पात भुजबळांची जळजळीत तोफ धडाडणार आहे.


भुजबळ यांचे भाषण ‘ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना’ या ज्वलंत विषयावर असून, सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशामुळे या विषयाला नवसंजीवनी मिळाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी २७% आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टाने दिल्यानंतर राजकीय वातावरण आधीच तापले आहे.



त्यातच केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेला जातगणनेचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा ठरतोय. गेल्या दशकभरापासून भुजबळ जातगणनेसाठी देशभरात आवाज उठवत आले आहेत. न्यायालयीन लढा असो वा संसदबाहेरील आंदोलन, भुजबळांचा पाठपुरावा थांबलेला नाही. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढा दिला, तर जातीय जनगणनेसाठी संसदेत आणि रस्त्यावर आवाज उठवला आहे.


समता परिषदेच्या माध्यमातून जातीनिहाय विकासाचे आराखडे तयार करण्यासाठीची मागणी त्यांनी सातत्याने पुढे रेटली आहे.


आता या दोन्ही विषयांवर भुजबळ वसंत व्याख्यानमालेत काय ठाम भूमिका मांडतात, हे पाहणं राजकीय वर्तुळात उत्सुकतेचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

गावची जमीन गावातच, मोरवणे ग्रामसभेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुण तालुक्यातील मोरवणे गावाच्या ग्रामसभेने एक ठराव केला आहे.

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या