BEST भाडेवाढीचा फटका: प्रवासी पळाले, बस थांबे ओस पडले; शेअर ऑटोवाल्यांची चांदी!

मुंबई : ‘सार्वजनिक सेवा’ ही केवळ कागदावरच उरली आहे का? BEST प्रशासनाने ९ मेपासून बसभाड्यात अचानक वाढ केल्यानंतर, प्रवाशांनी बेस्टकडे थेट पाठ फिरवली आहे. रोज हजारो मुंबईकरांचा भरवसा असलेली ही सेवा आता ओस पडली आहे. प्रवासी संख्या रोडावली आहे. बस थांबे रिकामे झालेत आणि मुंबईकर शेअर ऑटो-टॅक्सीच्या जुन्याच आडवाटेवर वळलेत.


सूत्रांच्या माहितीनुसार, BEST बससेवेची दररोजची प्रवासी संख्या किमान १० टक्क्यांनी घटली आहे. पण खरा धक्का म्हणजे ही फक्त सुरुवात आहे. प्रशासनाला धडकी भरलीय की ही घट आणखी वाढणार आणि प्रवासी कायमचे पर्यायी वाहतुकीत मिसळून जातील, अशी दाट शंका आहे.



भाडं वाढवलं, पण सेवा तशीच बकाल!


भाडं वाढूनही ना वेळेवर बस, ना योग्य सेवा. उलट प्रवाशांना बससाठी ३०–४० मिनिटं वाट पहात थांबावं लागतं. त्यात AC-Non AC भाडं अनुक्रमे १२ आणि १० रुपये केल्यावर लोकांनी तेवढ्या रकमेत शेअर ऑटोचा पर्याय निवडला आहे. काही ठिकाणी लोकांना १२ ऐवजी १५ रुपये द्यावे लागतात. बसपेक्षा ३ रुपये अधिक मोजावे लागले तरीही लोक खूशीने शेअर रिक्षा-टॅक्सीने लवकर जाता येते म्हणून खूश आहेत.


भाडेवाढीचा फटका मुख्यत्वे कामवाली बाया, सुरक्षा रक्षक, वयोवृद्ध, कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदारांना बसलाय. आता हेच लोक ३ रुपये जास्त देऊन १५चा शेअर ऑटो घेतात, पण २० मिनिटं बसची वाट बघत नाहीत.



शेअर ऑटोवाल्यांचीच चांदी!


मुलुंडच्या स्वप्न नगरीत भरत सोनी सांगतात, “४० मिनिटं बसची वाट बघणं म्हणजे वेळेचा अपमान. त्यापेक्षा तेच १० रुपये देऊन शेअर ऑटोने निघालेलं बरं!”


हिलसाईड रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनने जोरात टोला लगावला की, “भाडेवाढीचा फटका मुख्यतः कामगार, नोकरदार, वयोवृद्ध यांना बसतोय. आता तेही १५ रुपये देऊन ऑटो घेतात पण बसची वाट बघत नाहीत.”



आधीच चाललेली सेवा, आता अधिक कोलमडली


‘आमची मुंबई आमची BEST’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “पूर्वी ५/६ रुपये इतकं स्वस्त भाडं होतं. त्यावेळी लोकांच्या खिशाला परवडत होतं. आता मात्र भाडेवाढ झाल्याने तेवढ्याच पैशात १०/१२ रुपये देऊन लोकं शेअर टॅक्सी-ऑटोमध्ये वळत आहेत. ज्यामुळे ट्रॅफिक आणि प्रदूषण दोन्ही वाढतंय.”


वाहतूक विश्लेषक हुसैन इंदोरेवाला म्हणतात, “सरकारने वेळेवर मदत केली असती, तर ही अवस्था आली नसती. खासगीकरणाच्या नावाखाली सेवा मोडीत काढली जातेय.”


“महिम बसस्थानकाला भेट दिली तेव्हा धक्का बसला. इतकं मोठं वर्दळीचं ठिकाण पण येथे बसच नाहीत आणि प्रवासीही नाहीत! एवढं रिकामं दृश्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं.”


BESTने भाडं वाढवलं, पण दर्जा वाढवला नाही. यामुळे मुंबईकरांनी नाराजीने आपला रस्ता बदलला. सरकार आणि प्रशासन जर वेळेवर जागं झालं नाही, तर BEST ही सेवा 'भूतकाळातली आठवण' म्हणूनच उरू शकते! असेही अनेकांनी सांगितले.


दरम्यान, BEST अधिका-यांनी ही घट उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे असल्याचे सांगितले असले, तरी मुंबई मोबिलिटी फोरम आणि 'आमची मुंबई आमची BEST' या नागरी संस्थांनी ही कल्पना फेटाळली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "ही घट म्हणजे प्रवाशांनी पर्यायी वाहतुकीचा मार्ग निवडल्याचा हा परिणाम झालेला आहे."

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास