कच्छसह, दादर-बीकानेर एक्स्प्रेसला पालघर येथे थांबा

खासदार डॉ. सवरा यांच्या प्रयत्नांना यश


पालघर : पालघर जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी अखेर पूर्ण झाली असून, बांद्रा टर्मिनस-भुज कच्छ एक्स्प्रेस आणि बीकानेर-दादर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.


या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचा सक्रिय आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. त्यांनी रेल्वेमंत्र्यांना भेटून तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून ही मागणी सातत्याने मांडली होती. जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा विचार करता, तसेच प्रवाशांच्या सुविधेसाठी हे थांबे आवश्यक असल्याचे डॉ. सवरा यांनी वेळोवेळी अधोरेखित केले होते. पालघर रेल्वे स्थानकावर दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पालघर रेल्वे स्थानकावर निश्चित करण्यात आले आहेत.



पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, येथे वाढवण बंदर, विमानतळ प्रकल्प, तसेच तारापूर एमआयडीसी यांसारखी महत्त्वाची औद्योगिक केंद्रे कार्यरत आहेत. वाढती औद्योगिक गरज आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, या थांब्यांची आवश्यकता होती. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्याच्या नागरिकांना, उद्योग क्षेत्राला व प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम होणार आहे.

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक