Asthma : आला पावसाळा, दमा असलेल्यांनी काळजी घ्या!

मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. एक दोन दिवसात अंदमान निकोबार बेटे व दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळं पावसाळी वातावरणाचा फील अनुभवायला मिळतोय. येत्या पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईल. सध्या तापमान कमी जास्त होतेय. त्यामुळं वातावरण बदलत आहे. पावसाळी ऋतूमध्ये सर्दी , ताप, खोकला व साथीचे आजार उद्भवतात. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी.

?si=SyP_o4pciX-HwJVk

पावसाळ्यात दम्याचा त्रास जास्त संभवतो. त्यामागे हवेतील आर्द्रता, वातावरणातील अचानक बदल, घराच्या भिंतीला ओल आणि त्यामध्ये निर्माण होणारे मोल्ड किंवा बुरशी ही त्याची कारणं आहेत. या संपर्कातून सतत खोकला, छातीवर दाब, श्वास घेताना होणारा त्रास-घरघर अशी काही लक्षणे दिसतात. अस्थमा किंवा दमा हा श्वासनलिकेचा आजार आहे . हा ५-६ टक्के लोकांमध्ये आढळतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळतं. पावसाळ्यात अस्थमा म्हणजेच दम्याचा अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

आता अस्थम्याचे प्रकार व कारणे काय ? ते पाहू


काही रुग्णांचा दमा हा वंश परंपरागत असतो किंवा काही रुग्णांना अचानकच उतारवयात सुद्धा जाणवतो. कधी दमा फक्त ऋतूप्रमाणे असतो तर कधी बाराही महिने. वाढणारे वजन आणि ओबेसीटी हे सुद्धा दम्याचे एक कारण असू शकते, असे आरोग्य तज्ञ सांगतात. धूळ, परागकण यांची एलर्जी, बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, अपुरी झोप ही दम्याची काही कारणं सांगता येतील.


दम्याच्या त्रासपासून बचावासाठी काळजी काय घ्याल?


१. घराबाहेर मास्कचा वापर करावा.

२. बाहेरचे खाणे टाळावे.

३. फ्लू लसीकरण जरूर करून घ्यावे.

४. घरातील भिंतीवर असलेली ओल आणि बुरशी काढण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

५. हवेतील आर्द्रता जास्त असल्यास रूम हीटरचा वापर करता येईल.

सर्वप्रथम दम्याच्या रुग्णांचा शत्रू म्हणजे अॅलर्जी. अलर्जी शोधल्यावर त्यापासून दूर करण्यासाठी जीवनशैली बदलायची गरज असते. इनहेलर थेरपी हीच दम्यासाठी प्राथमिक उपचार पद्धती आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. दमा उपचारासाठी फुफ्फुसविकारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा; दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आपण सगळेच सज्ज झाले आहोत.

Gyan Bharatam project : ज्ञानभारतम् प्रकल्पाची सुरुवात; देशव्यापी हस्तलिखित सर्वेक्षण मोहिमेला प्रारंभ

मुंबई : भारताच्या समृद्ध ज्ञानपरंपरेचा अमूल्य ठेवा असलेल्या हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी