Asthma : आला पावसाळा, दमा असलेल्यांनी काळजी घ्या!

  45

मान्सूनसाठी पोषक वातावरण आहे. एक दोन दिवसात अंदमान निकोबार बेटे व दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. सध्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडतोय. त्यामुळं पावसाळी वातावरणाचा फील अनुभवायला मिळतोय. येत्या पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष पावसाळा सुरू होईल. सध्या तापमान कमी जास्त होतेय. त्यामुळं वातावरण बदलत आहे. पावसाळी ऋतूमध्ये सर्दी , ताप, खोकला व साथीचे आजार उद्भवतात. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी या काळात विशेष काळजी घ्यायला हवी.

?si=SyP_o4pciX-HwJVk

पावसाळ्यात दम्याचा त्रास जास्त संभवतो. त्यामागे हवेतील आर्द्रता, वातावरणातील अचानक बदल, घराच्या भिंतीला ओल आणि त्यामध्ये निर्माण होणारे मोल्ड किंवा बुरशी ही त्याची कारणं आहेत. या संपर्कातून सतत खोकला, छातीवर दाब, श्वास घेताना होणारा त्रास-घरघर अशी काही लक्षणे दिसतात. अस्थमा किंवा दमा हा श्वासनलिकेचा आजार आहे . हा ५-६ टक्के लोकांमध्ये आढळतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळतं. पावसाळ्यात अस्थमा म्हणजेच दम्याचा अटॅक येण्याची शक्यता अधिक असते.

आता अस्थम्याचे प्रकार व कारणे काय ? ते पाहू


काही रुग्णांचा दमा हा वंश परंपरागत असतो किंवा काही रुग्णांना अचानकच उतारवयात सुद्धा जाणवतो. कधी दमा फक्त ऋतूप्रमाणे असतो तर कधी बाराही महिने. वाढणारे वजन आणि ओबेसीटी हे सुद्धा दम्याचे एक कारण असू शकते, असे आरोग्य तज्ञ सांगतात. धूळ, परागकण यांची एलर्जी, बदलती जीवनशैली, धकाधकीचं जीवन, अपुरी झोप ही दम्याची काही कारणं सांगता येतील.


दम्याच्या त्रासपासून बचावासाठी काळजी काय घ्याल?


१. घराबाहेर मास्कचा वापर करावा.

२. बाहेरचे खाणे टाळावे.

३. फ्लू लसीकरण जरूर करून घ्यावे.

४. घरातील भिंतीवर असलेली ओल आणि बुरशी काढण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे.

५. हवेतील आर्द्रता जास्त असल्यास रूम हीटरचा वापर करता येईल.

सर्वप्रथम दम्याच्या रुग्णांचा शत्रू म्हणजे अॅलर्जी. अलर्जी शोधल्यावर त्यापासून दूर करण्यासाठी जीवनशैली बदलायची गरज असते. इनहेलर थेरपी हीच दम्यासाठी प्राथमिक उपचार पद्धती आहे आणि ते योग्य पद्धतीने वापरणे आवश्यक आहे. दमा उपचारासाठी फुफ्फुसविकारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
Comments
Add Comment

हुंड्याऐवजी मुलींसाठी फिक्स डिपॉझिट

मराठा समाजाची लग्न आचारसंहिता अहिल्यानगर : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणानंतर मराठा समाजातील

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य

बोगस डॉक्टरांना बसणार आळा पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता

भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी पोस्ट ऑफिस सज्ज, पावसाची चिंता मिटली; राखीसाठी वॉटरप्रूफ लिफाफा

पुणे (वार्ताहर) : दूरगावी असणाऱ्या भावाला आपली प्रेमाची राखी पाठविण्यासाठी सध्या बहिणींची लगबग सुरू आहे. तसेच

येमेनजवळ मोठी दुर्घटना, आफ्रिकन स्थलांतरितांची बोट बुडाली, ६० हून अधिक जणांचा मृत्यू

सना, येमेन: येमेनच्या किनाऱ्यावर रविवारी एक भीषण बोट दुर्घटना घडली, ज्यात ६० हून अधिक आफ्रिकन स्थलांतरितांचा

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या