BSF Jawan Returned: पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल 20 दिवसांनी BSF जवानाची पाकिस्तानने केली सुटका, अटारी-वाघा सीमेवर सोडले

  62

पहलगाम हल्ल्यानंतर चुकून सीमेपार गेलेल्या बीएसएफ जवानाची २० दिवसांनी सुटका


नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ एप्रिल रोजी एलओसीवर तैनात असलेले जवान पूर्णम कुमार शॉ यांनी चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडल्यामुळे, पाकिस्तान रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले होते. ज्यांची आज, बुधवारी सुटका करण्यात आली. तब्बल तीन आठवड्यानंतर अटारी बॉर्डरवर पाकिस्तानने जवान पूर्णम कुमार शॉ यांचा ताबा भारताकडे सोपविला.


बीएसएफने या संदर्भात निवेदनाद्वारे सदर माहिती दिली आहे. “पाकिस्तानी रेंजर्सनी २३ एप्रिल २०२५ रोजी ताब्यात घेतलेल्या जवान पूर्णम कुमार शॉ यांना भारताच्या स्वाधीन केले आहे. अमृतसरमधील अटारी पोस्ट येथे आज सकाळी १०.३० वाजता त्यांना सोडण्यात आले. बीएसएफ जवानाचे हस्तांतर अतिशय शांततापूर्ण आणि प्रोटोकॉलनुसार पार पडले.”

सैनिक किंवा नागरिकांकडून चुकून सीमा ओलांडणे असामान्य नाही आणि अशा बाबी सहसा मान्य केलेल्या लष्करी प्रक्रियेद्वारे सोडवल्या जातात. अशा प्रकरणांमध्ये, दोन्ही राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांमधील औपचारिक बैठकीनंतर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना परत पाठवले जाते.


७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर,  सीमेवरील परिस्थिती आणखी चिघळल्यानंतर, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या लष्करी कारवाया थांबवण्याचा "समंजसपणा" केल्याच्या काही दिवसांनी शॉ यांना सुखरूप पाठवले आहे.



काय आहे नेमके प्रकरण?


४० वर्षीय पूर्णम शॉ यांनी २३ एप्रिल रोजी शेतकऱ्यांचे संरक्षणासाठी ड्युटीवर असताना पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. पूर्णम शॉ अनवधानाने पाकिस्तानी हद्दीत गेले आणि पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर, ऑपरेशन सिंदूर, आणि भारत पाक लष्करी कारवायांमुळे दोन्ही देशांत तणाव वाढत गेला. मात्र १० मे रोजी झालेल्या शस्त्रसंधीनंतर, चार दिवसांनी शॉ यांची सुटका करण्यात आली.


तब्बल २० दिवस BSF जवान पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होते. ज्यांची आज सुखरूप सुटका करण्यात आली. शॉ हे पंजाबमधील फिरोजपूर सीमेवर बीएसएफच्या १८२ व्या बटालियनमध्ये तैनात आहेत.


Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या