वसई-विरार भागात 'मृत्यू' दबा धरून बसलाय? नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका!

  59

१५ ठिकाणी दरड कोसळण्याचे संकट!


विरार : रायगडच्या इर्शाळवाडीतील भीषण दरड दुर्घटनेचं सावट आता वसई-विरारवर घोंगावतंय. महापालिकेच्या अधिकृत यादीनुसार तब्बल १५ ठिकाणी दरड कोसळण्याचा थेट धोका आहे. गेल्या वर्षी वाघरळ पाड्यावर ज्या प्रकारे दरड कोसळून मृत्यूचे तांडव घडलं, तसंच काहीसं चित्र पुन्हा घडण्याची शक्यता पालिकेच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाली आहे. यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच येथील रहिवाशांची भीतीने गाळण उडाली असून पोटात गोळा आला आहे.



धोक्याचे १५ 'हॉटस्पॉट्स'?


वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत पुढील ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका आहे. मोरेगाव डोंगर, आचोळे डोंगरी, पडखड पाडा, पांच आंबा, शिर्डी नगर, काजू पाडा, निळेगाव, वालाई पाडा, नवजीवन डोंगरी, सतीवळी खिंड, वाघरळ पाडा, कुंडा पाडा, जानकी पाडा, गोखीवरे आलन पाडा ही ठिकाणं नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'रेड अलर्ट'वर आहेत.



पालिकेचीही कबुली, "धोका आहे खरा!"


वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडू शकते, अशी संभाव्य अपघातजन्य ठिकाणांची यादी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रशासनाने तयार केली आहे. पालिकेच्या अग्निशमन विभागाचे दिलीप पालव यांनी स्पष्ट केलं की, "आपली टीम २४ तास सज्ज आहे, पण नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. धोका हलका नाही."


पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले, "रिक्षामधून बॅनर लावून सतत जनजागृती सुरू आहे. जिथे धोका आहे, तिथे राहू नका, हे आवाहन आम्ही सातत्याने करत आहोत."



वैद्यकीय विभाग सज्ज


वसई -विरार शहरात अशा दुर्घटना घडल्यास जखमी रुग्णांवर वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी वैद्यकीय विभाग सज्ज आहे, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांनी दिली आहे.



इर्शाळवाडीतील भीषण अनुभव विसरलात का?


इर्शाळवाडी दुर्घटनेत संपूर्ण गाव ढिगा-याखाली गाडलं गेलं होतं. रात्रीच्या झोपेतच अनेकांना मृत्यूने गाठलं होतं. तोच इतिहास वसई-विरारमध्ये पुन्हा लिहिला गेला, तर जबाबदार कोण?



"पावसाळा आणखी रौद्र होणार!"


हवामान विभाग आणि भूवैज्ञानिक तज्ज्ञांनी यंदाच्या पावसात अधिक दरडी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पालिकेने 'फायर फायटिंग' ऐवजी 'डिझास्टर प्रिवेन्शन'वर भर द्यावा, अशी मागणी जोर धरतेय.



जीव वाचवायचा आहे तर... धोका असलेल्या ठिकाणी राहू नका!


पालिकेने दाखवलेला 'रेड मॅप' म्हणजे तुम्ही कुठे उभं राहायचं, कुठे नाही याचा निर्णय येथील लोकांनीच घ्यायचा आहे. मातीचा ढिगारा कधीही तुमच्यावर कोसळू शकतो. खबरदारी घ्या, जागृत राहा.



प्रभाग निहाय सर्वेक्षणाची आकडेवारी


बी – कोरेगाव डोंगर परिसर


डी – अचोले डोंगरी परिसर, पडखड पाडा, पांच आंबा, शिर्डी नगर, काजू पाडा


ई – निळेगाव डोंगर परिसर


एफ – वालाई पाडा, नवजीवन डोंगरी परिसर


जी – सतीवळी खिंड, वाघरल पाडा राजावली, वाघरल पाडा नाका राजावली, कुंडा पाडा सातीवली, जानकी पाडा, गोखीवरे आलन पाडा डोंगरी.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता