गॅसनंतर आता 'पाणी'ही महाग?

बाटलीबंद पाण्याच्या दरात घाऊक बाजारात वाढ


मुंबई  : इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता दुहेरी कात्री लागण्याची शक्यता आहे. आधीच एलपीजी गॅसच्या तुटवड्याने हैराण झालेल्या जनतेसमोर आता बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने बाटल्यांच्याira निर्मितीचा खर्च वाढला असून, घाऊक बाजारात पाण्याच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.


बाटलीबंद पाण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिक बाटल्या तयार करण्यासाठी कच्च्या तेलाची आवश्यकता असते. युद्धामुळे कच्च्या तेलाची उपलब्धता कमी झाली असून, वाहतुकीचा मार्ग लांबल्याने खर्चात मोठी वाढ झाली आहे. याचा थेट परिणाम बाटल्यांच्या उत्पादनावर झाला असून घाऊक विक्रेत्यांनी दरात वाढ केली आहे.


आधीच कमर्शियल गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल आणि खाणावळ मालक अडचणीत आहेत. आता पाण्याच्या बाटल्या महागल्याने ग्राहकांच्या थाळीचे आणि पिण्याच्या पाण्याचे दर वाढण्याची चिन्हे आहेत. घरगुती गॅसची नोंदणी वेळेत होत नसल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अशातच पाण्याचे दर वाढल्याने मध्यमवर्गीयांचे मासिक बजेट कोलमडणार आहे. घाऊक बाजारातील दरवाढीचा फटका लवकरच किरकोळ बाजारातही दिसेल, ज्यामुळे प्रति बाटली ५ ते १० रुपयांची वाढ होण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.


दरम्यान युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली तर आगामी काळात शीतपेये आणि इतर प्लास्टिक बंद उत्पादनांच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात
येत आहे.


कच्च्या तेलामुळे अनेक प्लास्टिकच्या वस्तू तयार केल्या जातात. त्याच्या उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या बाटल्यांप्रमाणे इतर प्लास्टिकच्या वस्तू देखील महाग होण्याची शक्यता आहे. पूर्वीपेक्षा आता बाटलीबंद पाण्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे बाटलीबंद पाण्यातून मिळणारा नफा देखील कमी झाला आहे.
- लता वेरणेकर, दुकानदार



नफ्यावर परिणाम


परंतु सर्वसामान्यांना किरकोळ बाजारात सध्या तरी कमाल किरकोळ विक्री किमतीमध्ये (एमआरपी) पाण्याची बाटली मिळत आहे. परंतु घाऊक बाजारात भाववाढ झाल्याने किरकोळ विक्रेत्यांच्या नफ्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. पूर्वी अर्धा लीटर २४ पाणी बंद बाटल्यांचा बॉक्स १२० रुपयांना किरकोळ व्यापाऱ्यांना मिळत होता. परंतु आता हाच बॉक्स १४० रुपयांना विक्री होत आहे. तर एक लीटरच्या १२ बाटल्यांच्या पाण्याच्या बाटलीसाठी आता १०५ रुपये मोजावे लागत होते. पूर्वी हा बॉक्स ९० रुपयांना मिळत होता.

Comments
Add Comment

Powai Lake Overflowing : आनंदवार्ता! मुंबईला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव दुथडी भरून वाहू लागला; पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे

Mumbai Rains Traffic : मुंबईकरांनो सावधान! मुसळधार पावसाने शहर ठप्प; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीलाही बसू लागला आहे. पश्चिम उपनगरात

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री

Vijaya Mehta : मराठी नाट्यसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

मुंबई : मराठी रंगभूमीला नवे विचार, नवी दिशा आणि असंख्य गुणी कलाकार देणाऱ्या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका (Theatre Director)

BMC : रस्ते विकासकामे झाडांच्या मुळांवर

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची कामे जोरात असून ही सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे

BMC News : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्या कापल्या

मुंबईतील ४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा (Rain) लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६