शिर्डी संस्थानची 'डोनेशन पॉलिसी' लागू, साई भक्तांसाठी १० हजारात थेट आरती!

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तयार केलेली ही योजना उच्च देणगीदार भक्तांसाठी विशेष सुविधा देणार आहे.


याआधी २५,००० देणाऱ्यांनाच आरती व विशेष दर्शनाचा लाभ मिळत होता. मात्र आता ही मर्यादा घटवून १०,००० करण्यात आली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “देणगीदार भाविकांची सेवा ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार ही योजना आखली गेली आहे.”



नव्या धोरणात काय मिळणार?




  • १०,००० – ५०,००० देणगी: ५ भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती




  • ५०,००० – १ लाख: दोन आरत्या व वर्षातून एकदा ५ जणांना मोफत दर्शन




  • १ लाख – १० लाख: दोन VVIP आरत्या व वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शन




  • १० लाख – १५ लाख: दोन VVIP आरत्या, ५ जणांना वर्षातून एकदा लाईफटाईम VIP दर्शन




  • ५० लाखांहून अधिक देणगी: तीन VVIP आरत्या व वर्षातून दोनदा लाईफटाईम VIP दर्शन




यासोबतच, पंढरपूरच्या धर्तीवर एक नवी अट लागू करण्यात आली आहे. सामान्य दर्शन रांगेत सुरुवातीस येणाऱ्या दोन भाविकांनाही आरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.


या नव्या धोरणामुळे साई भक्तांना सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार असून, संस्थानला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे