शिर्डी संस्थानची 'डोनेशन पॉलिसी' लागू, साई भक्तांसाठी १० हजारात थेट आरती!

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भाविकांसाठी नवी ‘डोनेशन पॉलिसी’ जाहीर केली असून, आता केवळ १०,००० देणगी देणाऱ्यालाही थेट आरतीचा मान मिळणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवर तयार केलेली ही योजना उच्च देणगीदार भक्तांसाठी विशेष सुविधा देणार आहे.


याआधी २५,००० देणाऱ्यांनाच आरती व विशेष दर्शनाचा लाभ मिळत होता. मात्र आता ही मर्यादा घटवून १०,००० करण्यात आली आहे. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, “देणगीदार भाविकांची सेवा ही आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार ही योजना आखली गेली आहे.”



नव्या धोरणात काय मिळणार?




  • १०,००० – ५०,००० देणगी: ५ भाविकांसाठी एक व्हीआयपी आरती




  • ५०,००० – १ लाख: दोन आरत्या व वर्षातून एकदा ५ जणांना मोफत दर्शन




  • १ लाख – १० लाख: दोन VVIP आरत्या व वर्षातून एकदा लाईफटाईम दर्शन




  • १० लाख – १५ लाख: दोन VVIP आरत्या, ५ जणांना वर्षातून एकदा लाईफटाईम VIP दर्शन




  • ५० लाखांहून अधिक देणगी: तीन VVIP आरत्या व वर्षातून दोनदा लाईफटाईम VIP दर्शन




यासोबतच, पंढरपूरच्या धर्तीवर एक नवी अट लागू करण्यात आली आहे. सामान्य दर्शन रांगेत सुरुवातीस येणाऱ्या दोन भाविकांनाही आरतीसाठी प्रवेश दिला जाणार आहे.


या नव्या धोरणामुळे साई भक्तांना सेवा-सुविधा अधिक सुलभ होणार असून, संस्थानला आर्थिकदृष्ट्या बळकटी मिळणार असल्याचं मानलं जात आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद