Pune Rain: पुण्यात अवकाळीने झोडपले, पुढील चार दिवस 'यलो' अलर्ट

पुणे: महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाने कहर केला आहे. कुठे मेघगर्जना, तर कुठे वादळी पाऊस आणि गारपीटमुळे जनसामान्यांची त्रेधातिरपट उडाली आहे.  हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे. पुणे शहर आणि त्याच्या परिसरात काल (सोमवार) पासून अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडत आहे. आज (मंगळवार) देखील शहराच्या मध्यवर्ती भागात पाऊसाची रिमझिम पुणेकरांना (Pune Rain) अनुभववायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात बरसणारा हा पाऊस पुण्यात पुढील ४ दिवस देखील पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने (IMD) नोंदवले आहे.


आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण होते आणि सकाळी ११:३० च्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची प्रचंड धावपळ झाली.



पुण्यात चार दिवस यलो अलर्ट


मे महिन्याच्या गरमीत पुणे शहरात अचानक सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.  त्यामुळे पुणेकरांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. असेच वातावरण पुढील काही दिवस राहणार असून, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस पुणे शहरात 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.



मुंबईत वादळाचा अंदाज


आज मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासूनच पाऊसाला सुरुवात झाली. दरम्यान, आज (मंगळवार) आणि उद्या (बुधवार) मुंबईत 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईत वादळाचा अंदाज आहे आणि दक्षिण कोकणातही 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.


तर एकंदरीत राज्याचे हवामान पाहिल्यास, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील घाट भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे