मुंबईकरांची कचऱ्यापासून होणार सुटका

  53

कचऱ्यांच्या गाड्यांसंदर्भात नवीन कंत्राट


मुंबई (वार्ताहर) : कचरा वाहून नेणाऱ्या हिरव्या रंगाच्या गाड्यांच्या जागी आता नव्या रंगसंगतीच्या कचरागाड्या येत्या काही महिन्यात रस्त्यावर दिसणार आहे. मुंबई महापालिकेने कचऱ्याच्या गाड्यांसदर्भात नवीन कंत्राट देण्याचे ठरवले आहे. नव्याने मेणारी वाहने मागील बाजूने झाकलेली असतील. तसेच कचऱ्यातून निघणारे पाणी साठवण्यासाठी यात स्वतंत्र व्यवस्था असेल. त्यामुळे रस्त्यावर पाणी सांडणार नाही, या नवीन गाड्यांची सेवा लवकरच मुंबई महापालिका घेणार आहे.


यामुळे कचरागाडांवर कचरा उचलून टाकणाऱ्या मोटर लोडरला काम उरणार नाही. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील कचरा झाडण्याचे काम दिले आहे. त्यालाही कामगार संघटनांनी विरोध केला आहे. कचरा संकलन व परिवहन हे अत्यंत महत्त्वाचे काम जर कंत्राटदारांकडून करून घेण्यात आले तर पालिकेला सर्वस्वी कंत्राटदारावर अवलंबून राहावे लागणार आहे. प्रस्तावित योजनेमुळे मोटर लोडर कामगारांचे हक्क बाचित होणार नाहीत अथवा त्यांचे आर्थिक नुकसानही होणार नाही. या कामगारांचे सर्व प्रकारचे आर्थिक लाभ अबाधित राहण्यासोबतच त्यांच्या वारसा हक्कास (पी. टी. केस) बाधा येणार नाही.


तसेच, महापालिकेचे सध्या अस्तित्वात असलेले कोणतेही यानगृह (गॅरेज) बंद केले जाणार नाहीत. - डॉ. अश्विनी जोशी, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सफेदसह पिवळ्या रंगाच्या गाड्या एकूण वाहनांपैकी सुमारे १० ते १५ टक्के याहने इलेक्ट्रिक स्वरुपाची असणार आहेत. कचरा उचलणे, कचरा पेटीची निगा, परिरक्षण, परिवहन आदी कामासाठी एकच यंत्रणा कार्यरत राहणार आहे. ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांमध्ये कचऱ्यांतून निघणारे सांडपाणी वाहनावच साठविण्याची व्यक्स्था असेल. परिणामी, रस्त्यावर पाणी सांडणार नाही तसेच दुर्गधीही पसरणार नाही. नंतर, या सांडपाण्याची क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही