Indian Army killed Terrorists: काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश (Indian Army killed Terrorists) आलं आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाचा पहलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हंटले जात आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांमध्ये चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.



पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार


शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली होती. ज्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने त्या परिसरात वेढा घालत धडक कारवाईला सुरुवात केली. ज्यात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहिद अहमद कुट्टे या दहशतवाद्याचेही नाव समोर येत आहे. तर दूसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे आहे, हा दहशतवादी देखील (TRF) शी संबंधित होता.


Comments
Add Comment

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या

Budget 2026 : ‘विकसित भारताच्या दिशेने दमदार पाऊल’; केंद्रीय अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : देशाचा २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget 2026 ) सादर झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र

Budget 2026 : मच्छिमारांसाठी आनंदाची बातमी! खुल्या समुद्रातील मासेमारी आता 'करमुक्त'; निर्यातीला मिळणार मोठी गती

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात देशातील ग्रामीण

Budget 2026 : कोकणचा काजू-नारळ सातासमुद्रापार जाणार! अर्थमंत्र्यांचा 'हाय-व्हॅल्यू' शेतीवर भर; कोकणकर होणार मालामाल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या