Indian Army killed Terrorists: काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश (Indian Army killed Terrorists) आलं आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाचा पहलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हंटले जात आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांमध्ये चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.



पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार


शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली होती. ज्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने त्या परिसरात वेढा घालत धडक कारवाईला सुरुवात केली. ज्यात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहिद अहमद कुट्टे या दहशतवाद्याचेही नाव समोर येत आहे. तर दूसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे आहे, हा दहशतवादी देखील (TRF) शी संबंधित होता.


Comments
Add Comment

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित

िववाह हे केवळ शारीरिक संतुष्टीचे साधन नव्हे...

‘लिव्ह-इन रिलेशनशिप’वर सरसंघचालक मोहन भागवत यांचे स्पष्ट मत कोलकाता : "कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक

रेल्वे प्रवासभाड्यात वाढ

२६ डिसेंबरपासून अंमलबजावणी नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने रेल्वे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून

कंगना राणौत हिंदी सल्लागार समितीची सदस्य बनली,जाणून घेऊया किती वर्षांचा असेल कार्यकाळ

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौत ही आता आपल्याला चित्रपटासोबत मंत्रालयामध्ये देखील पहायला मिळणार

किश्तवाड जिल्ह्यातील रतले जलविद्युत प्रकल्पात २९ संशयित मजूर ?

श्रीनगर  : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे चिनाब नदीवर उभारल्या जाणाऱ्या ८५० मेगावॉट क्षमतेच्या ‘रतले हायड्रो

‘एगोज’च्या प्रसिद्ध ब्रँडची अंडी वादाच्या भोवऱ्यात

नवी दिल्ली  : अंड्याला आरोग्यासाठी ‘सुपरफूड’ मानले जाते, मात्र सध्या अंड्यांच्या गुणवत्तेवरून देशभरात एकच खळबळ