Indian Army killed Terrorists: काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार

  93

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश (Indian Army killed Terrorists) आलं आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाचा पहलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हंटले जात आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांमध्ये चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.



पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार


शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली होती. ज्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने त्या परिसरात वेढा घालत धडक कारवाईला सुरुवात केली. ज्यात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहिद अहमद कुट्टे या दहशतवाद्याचेही नाव समोर येत आहे. तर दूसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे आहे, हा दहशतवादी देखील (TRF) शी संबंधित होता.


Comments
Add Comment

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली

देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

नवी दिल्ली : देशातील ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया निवडणूक