Indian Army killed Terrorists: काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा, पहलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील जंगलात सकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश (Indian Army killed Terrorists) आलं आहे. या दहशतवाद्यांपैकी एकाचा पहलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हंटले जात आहे.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये शोपियानच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते. दहशतवादी दृष्टीस पडताच भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरु केली. यादरम्यान दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांमध्ये चकमक झाली. यानंतर भारतीय सैन्याच्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेचे असल्याचे समजते.



पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी ठार


शोपियान जिल्ह्यातील केलर येथील शुकरुच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली होती. ज्याची खबर मिळताच भारतीय सैन्याने त्या परिसरात वेढा घालत धडक कारवाईला सुरुवात केली. ज्यात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शाहिद अहमद कुट्टे या दहशतवाद्याचेही नाव समोर येत आहे. तर दूसऱ्या दहशतवाद्याचे नाव अदनान शफी असे आहे, हा दहशतवादी देखील (TRF) शी संबंधित होता.


Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे