आयात शुल्कावरुन अमेरिका आणि भारत यांच्यातील वाद चिघळला

नवी दिल्ली : अमेरिकेने भारताच्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या या निर्णयाविरोधात भारताने जागतिक व्यापार संघटनेकडे नाराजी नोंदवली आहे. तसेच भारताने अमेरिकेच्या उत्पादनांवर आयात शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे पाठवला आहे.

अमेरिकेने देशाच्या सुरक्षेचे कारण देत स्टील आणि अॅल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क लागू केले आहे. पण या निर्णयामुळे भारत अमेरिकेला निर्यात करत असलेल्या ७७.६ अब्ज डॉलरच्या मालाच्या किंमतीत वाढ होणार आहे. भारतीय उत्पादनांवर थेट १.९१ अब्ज डॉलरचा भार पडणार आहे. भारताच्या निर्यात व्यापारात घट होण्याचा धोका आहे. यामुळे भारताने जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचा आधार घेतला आहे. भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेकडे आयात शुल्कांचा नवा प्रस्ताव पाठवला आहे. या प्रस्तावानुसार अमेरिकेच्या निर्णयाला उत्तर म्हणून देशहिताच्या रक्षणासाठी भारत अमेरिकेच्या निवडक उत्पादनांवर आयात शुल्क वाढवून नुकसान भरपाई वसूल करणार आहे.

याआधी २०१८ मध्ये अमेरिकेने स्टील आणि अॅल्युमिनियम संदर्भातले स्वतःचे आयात धोरण बदलले होते. त्यावेळी भारताने नुकसान भरपाईसाठी अमेरिकेतून भारतात येणाऱ्या २८ उत्पादनांवर वाढीव आयात शुल्क अर्थात टॅरिफ लागू केले होते.
Comments
Add Comment

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला

Stock Market: सकाळच्या सत्रात आजही शेअर बाजार गडगडले ! बँक निर्देशांकांने सावरले सकाळची 'अशी' आहे परिस्थिती

मोहित सोमण : सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सत्राच्या सुरुवातीलाच शेअर बाजार

रशियाच्या दोन मोठ्या निर्णयांमुळे भारताचा फायदा

मॉस्को : भारत रशियातून करत असलेल्या आयातीत वाढ झाली आहे. वाजवी दरामुळे भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची

मुंबईतील कचरा खासगीकरणाच्या निविदेला विलंब

खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

दुर्गंधी पसरत नाही की कचरा दिसत नाही, मुंबईतल्या अनोख्या कचरापेट्या

सचिन धानजी, मुंबई : मुंबईत आज कुणालाच आपल्या घरासमोर कचरा नको असतो. तसेच सार्वजनिक कचरा पेट्या असल्यास त्या

नवी मुंबई विमानतळामुळे महामार्गावर 'ट्रॅफिक कोंडी'चा धोका!

विमानतळासाठी वाहतूक 'वळवणार'; पाम बीच रोडवरील गर्दी टाळण्यासाठी 'सिक्रेट प्लॅन' लागू नवी मुंबई: नवी मुंबई