क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना दिला पाठिंबा, IPL 2025मध्ये खेळण्याबाबत दिली मोठी अपडेट

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे गेल्या आठवड्यात आयपीएल २०२५ची स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, आता १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे ब्लॅकआऊटमुळे ८ मेला धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच थांबवावा लागला होता. सर्व सामने स्थगित करण्यात आले होते. यानंतर नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.


त्यातच आयपीएलची पुन्हा घोषणा झाल्यानंतर परदेशी खेळाडू पुन्हा भारतात येऊन बाकी सामने खेळणार की नाही याबाबत सगळ्याती आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रतिक्रिया दिली आहे.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रेस रिलीजमध्ये सांगितले की आयपीएलसाठी पुन्हा भारतात जावून खेळायचे की नाही हा पूर्णपणे खेळाडूंचा प्रश्न आहे. आयपीएलमध्ये अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि कमेंटेटर रूपात सामील आहेत. त्यातील अधिकांश लोकांनी भारत सोडून मायदेशात परतले आहेत. अनेक खेळाडू तसेच कोच भारत-पाकिस्तान यांच्यातील घटनेने घाबरले आहेत.


 


त्यातच जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना आहे. ११ जूनला हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक सामन्यावर सुरू आहे. म्हणजेच ३ जूनला आयपीएलचा फायनल सामना आणि त्यानंतर एका आठवड्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना असणार आहे.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विधानात म्हटले की क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या वैयक्तिक निर्णयाला समर्थन देईल. त्यांना भारतात परतायचे आहे की नाही हे त्यांनी ठरवावे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला पाठिंबा देईल. संघ व्यवस्थापन त्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीच्या निहितार्थवर काम करेल जे उरलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग निवडतील. आम्ही सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षेबाबत ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयसोबत संवाद साधत आहोत.

Comments
Add Comment

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील