क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना दिला पाठिंबा, IPL 2025मध्ये खेळण्याबाबत दिली मोठी अपडेट

  56

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे गेल्या आठवड्यात आयपीएल २०२५ची स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, आता १७ मेपासून पुन्हा एकदा आयपीएलचा थरार रंगणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे ब्लॅकआऊटमुळे ८ मेला धरमशाला येथे पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना मध्येच थांबवावा लागला होता. सर्व सामने स्थगित करण्यात आले होते. यानंतर नव्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.


त्यातच आयपीएलची पुन्हा घोषणा झाल्यानंतर परदेशी खेळाडू पुन्हा भारतात येऊन बाकी सामने खेळणार की नाही याबाबत सगळ्याती आधी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रतिक्रिया दिली आहे.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रेस रिलीजमध्ये सांगितले की आयपीएलसाठी पुन्हा भारतात जावून खेळायचे की नाही हा पूर्णपणे खेळाडूंचा प्रश्न आहे. आयपीएलमध्ये अनेक ऑस्ट्रेलियन खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि कमेंटेटर रूपात सामील आहेत. त्यातील अधिकांश लोकांनी भारत सोडून मायदेशात परतले आहेत. अनेक खेळाडू तसेच कोच भारत-पाकिस्तान यांच्यातील घटनेने घाबरले आहेत.


 


त्यातच जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना आहे. ११ जूनला हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक सामन्यावर सुरू आहे. म्हणजेच ३ जूनला आयपीएलचा फायनल सामना आणि त्यानंतर एका आठवड्यातच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना असणार आहे.


क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या विधानात म्हटले की क्रिकेट ऑस्ट्रेलिया खेळाडूंच्या वैयक्तिक निर्णयाला समर्थन देईल. त्यांना भारतात परतायचे आहे की नाही हे त्यांनी ठरवावे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया त्याला पाठिंबा देईल. संघ व्यवस्थापन त्या खेळाडूंसाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तयारीच्या निहितार्थवर काम करेल जे उरलेल्या आयपीएलमध्ये खेळण्याचा मार्ग निवडतील. आम्ही सुरक्षा व्यवस्था आणि सुरक्षेबाबत ऑस्ट्रेलियन सरकार आणि बीसीसीआयसोबत संवाद साधत आहोत.

Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल