म्हाडा यावर्षी जुलैमध्ये काढणार ४ हजार घरांसाठी लॉटरी

  109

म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लॉटरी


मुंबई : येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईमधील पाच हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery) येणार आहे. यापूर्वी याचवर्षी जुलै महिन्यामध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे चार हजार घरांची बंपर लॉटरी काढली जाणार आहे. यातील सर्वाधिक घरे ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.


म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३० हजार घरांची लॉटरी काढण्याचे नियोजन आहे. त्यानुसार दर तीन ते चार महिन्यांनी म्हाडाच्या विविध मंडळाची लॉटरी निघणार आहे. गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळाने तीन लॉटरी काढल्या असून सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न साकार केले आहे.


आता जुलै महिन्यात पुन्हा एकदा सुमारे ४ हजार घरांची लॉटरी काढण्याची तयारी कोकण मंडळाने सुरू केली आहे. यात म्हाडाने स्वतः चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह हाउसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा देखील समावेश असणार आहे. कल्याण येथे एकाच खासगी विकासकाकडून म्हाडाला अडीच हजार घरे उपलब्ध होणार असून यांचा देखील लॉटरीमध्ये समावेश केला जाणार आहे.



चितळसर येथे म्हाडाने २२ मजली ७ इमारती उभारल्या असून येथील पाण्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ठाणे महानगर पालिकेकडून अद्याप या इमारतींना ओसी मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर म्हाडा आणि ठाणे महापालिका अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून सदर प्रकल्पासाठी अमृत योजनेंतर्गत महापालिका पाण्याची टाकी बांधणार आहे. तोपर्यंत येथील घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी तात्पुरती जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यानंतर ओसी मिळताच येथील घरांचा लॉटरीमध्ये समावेश केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Assembly Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला, हिंदी सक्ती, शक्तीपीठ या मुद्द्यावरुन वातावरण पेटणार; कधी होणार अधिवेशन? जाणून घ्या...

मुंबई : यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरलेला आहे. येत्या ३० जून ते १८ जुलै या काळात

ऊर्जा विभागाच्या कामकाजाचा बोर्डीकर यांनी घेतला आढावा

मुंबई  : राज्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर ऊर्जा पंपाची मागणी पूर्ण करावी. महावितरण, महाजनको आणि

केबल-स्टे ब्रीज तयारीचा महानगर आयुक्तांनी घेतला आढावा

पावसाळ्यात पूल सुरू करणार : संजय मुखर्जी मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तार प्रकल्पस्थळास

लालबाग पुलावरील गळती आता कायमचीच थांबली

खराब पर्जन्य जलवाहिन्या मनपाच्या वतीने बदलण्यात आल्या मुंबई: लालबाग उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून

पश्चिम रेल्वेकडून दोन विशेष गाड्या उकई सोनगड स्थानकावर थांबणार

मुंबई  : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे चालवण्यात येणाऱ्या उधना-मिरज आषाढी एकादशी विशेष गाडीला उकाई सोनगड

औद्योगिक उत्कर्षाकडे महाराष्ट्राची यशस्वी वाटचाल!

‘एमआयडीसी’ आयोजित ‘महाराष्ट्र उद्योग संवाद’ कार्यक्रमाचे बीकेसी येथे उद्घाटन मुंबई  : जगाच्या अनेक भागांत