तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. हे शेअर ४३.५० रुपयांवर पोहोचले. कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. रिलायन्स पॉवरने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत १२६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ३९७.५६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत २०६६ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न २१९३.८५ कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च मार्च २०२५ च्या तिमाहीत १९९८.४९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २६१५.१५ कोटी रुपयांवर होता.


आर्थिक वर्ष २०२४-२५ चा विचार केला तर रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा २९४७.८३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला २०६८.३८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत १३ मे २०२४ रोजी २४.४० रुपये होती. १२ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४३.५० रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. १५ मे २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १.८० रुपयांवर होते. १२ मे २०२५ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४३ रुपयांच्या पुढे गेले. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५३.६४ रुपये आहे. त्याच वेळी, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३.३० रुपये आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास

Blue Economy : 'मेरिकल्चर, ट्यूना मासेमारीतून अधिकचे उत्पन्न मिळेल'

मुंबई : सागरी विकास, मत्स्यव्यवसाय आणि आर्थिक संधी वाढवण्यावर ब्ल्यू इकॉनॉमी अत्यंत उपयुक्त आहे. मेरिकल्चर,