तोट्यातून नफ्यात आली अनिल अंबांनींची कंपनी

मुंबई : अनिल अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स पॉवरचे शेअर्स वधारले आहे. मुंबईच्या शेअर बाजारात अर्थात बीएसईमध्ये सोमवारी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ दिसून आली. हे शेअर ४३.५० रुपयांवर पोहोचले. कंपनी तोट्यातून नफ्यात परतली आहे. रिलायन्स पॉवरने ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत १२६ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला ३९७.५६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न चौथ्या तिमाहीत २०६६ कोटी रुपये होते. गेल्या वर्षी याच कालावधीत रिलायन्स पॉवरचे एकूण उत्पन्न २१९३.८५ कोटी रुपये होते. कंपनीचा एकूण खर्च मार्च २०२५ च्या तिमाहीत १९९८.४९ कोटी रुपयांवर आला आहे, जो गेल्या वर्षी याच कालावधीत २६१५.१५ कोटी रुपयांवर होता.


आर्थिक वर्ष २०२४-२५ चा विचार केला तर रिलायन्स पॉवरचा एकत्रित निव्वळ नफा २९४७.८३ कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीला २०६८.३८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


गेल्या एका वर्षात रिलायन्स पॉवरचे शेअर्स ७५ टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत १३ मे २०२४ रोजी २४.४० रुपये होती. १२ मे २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ४३.५० रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांबद्दल बोलायचे झाले तर रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. १५ मे २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १.८० रुपयांवर होते. १२ मे २०२५ रोजी रिलायन्स पॉवरचे शेअर्स ४३ रुपयांच्या पुढे गेले. गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये २६५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ५३.६४ रुपये आहे. त्याच वेळी, रिलायन्स पॉवरच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २३.३० रुपये आहे.

Comments
Add Comment

IMD: महाराष्ट्रासाठी 'चक्रीवादळ शक्ती'चा इशारा; ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता

पुणे/मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) अरबी समुद्रात विकसित होत असलेल्या 'चक्रीवादळ शक्ती' च्या पार्श्वभूमीवर

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन

वॉशिंग्टन : अमेरिकेते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या