Accident: छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू

रायपूर: छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये भीषण रस्ते अपघात झाला आहे. रायपूर-बालोदाबाजार मार्गावर सरागांवजवळ रविवारी रात्री उशिरा एक ट्रक आणि ट्रेलर यांच्यात टक्कर झाली. या अपघातात कमीत कमी १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.


जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ९ महिला, २ मुली, एक किशोरवयीन तर ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.


या ट्रेलरमधून लोक बाळाच्या सहा महिन्याच्या कार्यक्रमावरून परतत होते. मत्यू पावलेले हे सर्व लोक छत्तीसगडच्या चटौद गावाचे निवासी पुनीत साहू यांचे नातेवाईक होते.


 


रायपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात त्यावेळेस झाला जेव्हा हे सगळे लोक कार्यक्रमावरून परतत होते. जखमींना उपचारासाठी रायपूरच्या डॉ. बी. आर. आंबेडकर मेमोरियल रुग्णालय आणि खरसोरा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये मुले आणि महिलांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शुक्रवारी देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनला दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी हरियाणातील जिंद रेल्वे स्थानकावरून जिंद आणि सोनीपत दरम्यान

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.