वहिवाटीच्या रस्त्यावर उभारलं पक्कं घर; शेवटी गजराजने केलं साफ!

अमरावती, शिरखेड : गावातील शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्यावर आणि सरकारी जमिनीवर दिलीप खराते यांनी सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर बांधलं होतं. याच परिसरात इतर नागरिकांनीही गुरांचे गोठे उभारले होते. ही सर्व अतिक्रमणं सर्वे नं. ७३ वर करण्यात आली होती.


वर्ष २०१७–१८ पासून सुरू असलेलं हे अतिक्रमण, ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही थांबवलं गेलं नव्हतं. अखेर ३० जुलै २०२४ रोजी अंतिम नोटीस देण्यात आली. खराते यांनी अप्पर आयुक्तांकडे दाद मागत स्टे मिळवला, पण ५ मे २०२५ च्या सुनावणीत तो स्टे उठवण्यात आला.



शेवटी १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गजराजच्या सहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तात शिरखेड ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. यावेळी फक्त एकच नव्हे, तर पाच अतिक्रमणं हटवण्यात आली.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद