वहिवाटीच्या रस्त्यावर उभारलं पक्कं घर; शेवटी गजराजने केलं साफ!

अमरावती, शिरखेड : गावातील शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्यावर आणि सरकारी जमिनीवर दिलीप खराते यांनी सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर बांधलं होतं. याच परिसरात इतर नागरिकांनीही गुरांचे गोठे उभारले होते. ही सर्व अतिक्रमणं सर्वे नं. ७३ वर करण्यात आली होती.


वर्ष २०१७–१८ पासून सुरू असलेलं हे अतिक्रमण, ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही थांबवलं गेलं नव्हतं. अखेर ३० जुलै २०२४ रोजी अंतिम नोटीस देण्यात आली. खराते यांनी अप्पर आयुक्तांकडे दाद मागत स्टे मिळवला, पण ५ मे २०२५ च्या सुनावणीत तो स्टे उठवण्यात आला.



शेवटी १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गजराजच्या सहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तात शिरखेड ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. यावेळी फक्त एकच नव्हे, तर पाच अतिक्रमणं हटवण्यात आली.

Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर