वहिवाटीच्या रस्त्यावर उभारलं पक्कं घर; शेवटी गजराजने केलं साफ!

अमरावती, शिरखेड : गावातील शेतकऱ्याच्या वहिवाटीच्या रस्त्यावर आणि सरकारी जमिनीवर दिलीप खराते यांनी सिमेंट काँक्रीटचं पक्कं घर बांधलं होतं. याच परिसरात इतर नागरिकांनीही गुरांचे गोठे उभारले होते. ही सर्व अतिक्रमणं सर्वे नं. ७३ वर करण्यात आली होती.


वर्ष २०१७–१८ पासून सुरू असलेलं हे अतिक्रमण, ग्रामपंचायतीने वारंवार नोटीस देऊनही थांबवलं गेलं नव्हतं. अखेर ३० जुलै २०२४ रोजी अंतिम नोटीस देण्यात आली. खराते यांनी अप्पर आयुक्तांकडे दाद मागत स्टे मिळवला, पण ५ मे २०२५ च्या सुनावणीत तो स्टे उठवण्यात आला.



शेवटी १० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गजराजच्या सहाय्याने आणि पोलीस बंदोबस्तात शिरखेड ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर बुलडोझर चालवला. यावेळी फक्त एकच नव्हे, तर पाच अतिक्रमणं हटवण्यात आली.

Comments
Add Comment

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन