भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान बंद असलेली ३२ विमानतळे सुरू होणार

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या सुचनेनुसार भारतीय हवाई क्षेत्र आता पूर्णपणे उघडण्यात आली आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील तणावादारम्यान बंद असलेली ३२ विमानताळे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने असे म्हटले आहे की प्रवाशांच्या लक्ष वेधण्यासाठी १५ मे २०२५ रोजी सकाळी ५. २९ वाजेपर्यंत ३२ विमानतळे नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. पण आता ही विमानतळे तात्काळ नागरी विमानांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहेत.


या कालावधीमध्ये प्रवाशांना नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाईटवर लक्ष ठेवण्याचा आणि एअरलाइन्सशी थेट संपर्क साधून त्यांच्या फ्लाइटची स्थिती जाणून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे केवळ हवाई वाहतूक कमी होण्यास मदत होणार नाही तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनाही फायदा होणार आहे.


७ मे रोजी भारतीय सैनिकांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानमधील नऊ दहशदवादी अड्ड्यावर हल्ला केला आणि पहलगाम दहशदवादी हल्ल्याचा बदल घेतला ज्यामध्ये २६ निष्पाप लोक मारली गेली होती. यामधील बहुतेक लोक ही पर्यटक होती. भारतीय सैन्यांच्या कारवाईने घाबरलेल्या पाकिस्ताननेही नियंत्रण रेषा आणि सीमेपलीकडील ड्रोन तसेच क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले केले. हे लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून निर्बंध शनिवारी सकाळपर्यंत लागू राहणार होत. पण नंतरच्या वाढत्या तणावामुळे ते १५ मे पर्यंत वाढवण्यात आले.



भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतरचा हा निर्णय सामान्य विमान वाहतूक क्रियाकलाप पुनर्संचयित करण्याचे संकेत देत आहे. या निर्णयामुळे हवाई वाहतूक कोंडी कमी होईल आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना फायदा होईल. ऑपरेशन सिंदूर' नंतर खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतामधील अनेक विमानतळं तात्पुरती बंद करण्यात आली होती. २०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. माहितीनुसार, खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, शिमला, धर्मशाळा, जामनगर आणि इतर अनेक विमानतळ बंद करण्यात आली होती. एकट्या इंडिगोने त्यांच्या १६० ते १६५ नियोजित विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. दरम्यान, आता देशातील तात्पुरती बंद करण्यात आलेली ३२ विमानतळांची सेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे.


विमानसेवा सुरु झालेल्या विमानतळांची यादी




  1. अधमपूर

  2. अंबाला

  3. अमृतसर

  4. अवंतीपूर

  5. भटिंडा

  6. भुज

  7. बिकानेर

  8. चंदीगड

  9. हलवारा

  10. हिंडन

  11. जैसलमेर

  12. जम्मू

  13. जामनगर

  14. जोधपूर

  15. कांडला

  16. कांगडा (गग्गल)

  17. केशोड

  18. किशनगड

  19. कुल्लू मनाली (भुंटर)

  20. लेह

  21. लुधियाना

  22. मुंद्रा

  23. नळ्या

  24. पठाणकोट

  25. पटियाला

  26. पोरबंदर

  27. राजकोट (हिरासर)

  28. सारसावा

  29. शिमला

  30. श्रीनगर

  31. थोइस

  32. उत्तरलाई

Comments
Add Comment

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना

Types of Earrings : नक्की ट्राय करा 'या' आउटफिटसोबत 'हे' इयररिंग्स

मुंबई : एखादा सुंदर ड्रेस किंवा आकर्षक साडी परिधान केल्यानंतरही लूक पूर्ण वाटत नाही, यामागचे एक महत्त्वाचे कारण

Cooper Hospital : कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह, BMC ने दिली मोठी अपडेट

‘मुंबई Mumbai :  कूपरच्या प्रसाधनगृहात अर्भकाचा मृतदेह’ या विषयाच्या अनुषंगाने विविध प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या