पद्म पुरस्कार समितीवर मंत्री नितेश राणेंची निवड

मुंबई : दरवर्षी प्रजात्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्यावतीने नागरी सन्मान केले जातात. पद्म पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी देशभरातून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील गुणवतं नागरिकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पद्म पुरस्कारासाठी राज्याच्यावतीने शिफारस करण्यासाठी नावं सुचविणार आहे. या समितीत राज्य शासनाच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल आहेत. समितीत सदस्य म्हणून मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले आणखी दोन जण आहेत. यापैकी एक आहेत ते आशिष शेलार आणि दुसरे आहेत नितेश राणे.

समितीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे आहेत.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.
Comments
Add Comment

रंगांमधून उमलणारी स्वप्नं : जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये

दिव्यांग कलाकारांसाठी ‘विविधतेचा उत्सव’ मुंबई : कॅनव्हासवर रंग उमटत होते, पण ते केवळ चित्र

सागरी सुरक्षेसाठी आणखी १० ड्रोन खरेदी करा!

मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; संवेदनशील लँडिंग पॉईंट्सवर सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि 'सागर मित्र' नेमणार मुंबई

Metro-9 from Dahisar to Mira Bhayandar दहिसर ते मीरा भाईंदर 'मेट्रो-९'ला मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा सुरू; वाहतूक कोंडीतून होणार सुटका मुंबई :

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

रस्ते विकासाच्या कामांबाबत मनसेच्या किल्लेदारांचा स्थायी समिती अध्यक्षांना सवाल

अर्थसंकल्पावरील भाषणात घेतला समाचार मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांच्या कामांच्या विकासाची कामे

प्रत्येक उद्यानांमध्ये बोअरवेल खोदण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबईमधील महानगरपालिकेच्या सर्व विद्यमान उद्यानांमध्ये व उद्यानांचा विकास करुन नव्याने तयार करण्यात