पद्म पुरस्कार समितीवर मंत्री नितेश राणेंची निवड

मुंबई : दरवर्षी प्रजात्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्यावतीने नागरी सन्मान केले जातात. पद्म पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी देशभरातून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील गुणवतं नागरिकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पद्म पुरस्कारासाठी राज्याच्यावतीने शिफारस करण्यासाठी नावं सुचविणार आहे. या समितीत राज्य शासनाच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल आहेत. समितीत सदस्य म्हणून मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले आणखी दोन जण आहेत. यापैकी एक आहेत ते आशिष शेलार आणि दुसरे आहेत नितेश राणे.

समितीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे आहेत.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.
Comments
Add Comment

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात

घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेचा पुढाकार, 'या' केंद्राची केली स्थापना

मुंबई (खास प्रतिनिधी) : वैवाहिक जीवनासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण कमी