पद्म पुरस्कार समितीवर मंत्री नितेश राणेंची निवड

मुंबई : दरवर्षी प्रजात्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्यावतीने नागरी सन्मान केले जातात. पद्म पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी देशभरातून शिफारशी मागवल्या जातात. महाराष्ट्रातून पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याकरिता राज्य शासनाने एक सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती राज्यातील गुणवतं नागरिकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पद्म पुरस्कारासाठी राज्याच्यावतीने शिफारस करण्यासाठी नावं सुचविणार आहे. या समितीत राज्य शासनाच्या सात मंत्र्यांचा समावेश आहे. समितीच्या अध्यक्षस्थानी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार रावल आहेत. समितीत सदस्य म्हणून मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले आणखी दोन जण आहेत. यापैकी एक आहेत ते आशिष शेलार आणि दुसरे आहेत नितेश राणे.

समितीत शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री आहेत. शिवसेनेकडून दादा भुसे आणि उदय सामंत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे आहेत.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने राज्य सरकारला दिले आहेत. त्यानुसार, सरकारकडे प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांची छाननी करून केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी योग्य व्यक्तींची शिफारस ही समिती राज्य सरकारला करेल.
Comments
Add Comment

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील