मोदींच्या गुजरातमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताच्या एअर डिफेन्स गनने उडवला धुरळा

कच्छ: भारताने दहशतवादविरुद्ध केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान बिथरला असून, पाकने भारतीय सीमारेषेवरील ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे हे हल्ले भारत यशस्वीरित्या परतवून लावत आहे. दरम्यान, गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला असल्याची माहिती संरक्षक अधिकाऱ्यांनी दिली आहे.


जम्मू-काश्मीरपासून पंजाब आणि राजस्थानपर्यंत पाकिस्तानकडून होत असलेल्या ड्रोन हल्ल्यांना भारताने चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कराने सकाळीच दावा केला आहे की त्यांच्या तीन हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे बिथरलेल्या पाकड्यांनी भारताच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे.



सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न


पाकिस्तान जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमावर्ती शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासांत पाकिस्तानने २६ ठिकाणी हल्ले केले. यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले आहे. नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी अधूनमधून गोळीबार सुरू आहे.



जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात ड्रोनचे तुकडे


गुजरातमधील कच्छ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने एल-७० एअर डिफेन्स गनचा वापर करून पाकिस्तानी सैन्याचा एक सशस्त्र ड्रोन यशस्वीरित्या पाडला. दरम्यान, जालंधर ग्रामीणमधील एका गावातील शेतात क्षेपणास्त्राचे तुकडे आढळले. पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Comments
Add Comment

High Court Verdict : अपंगत्व हे घटस्फोटाचं कारण ठरू शकत नाही! पत्नीला सोडणाऱ्या पतीला उच्च न्यायालयाचे फटकारे

'आजारपणात जोडीदाराची साथ सोडणे अमानुष'; मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द

Mumbai Footpath : मुंबईतील ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ होणार अतिक्रमण मुक्त

अतिरिक्त आयुक्तांना दिले १५ दिवसांमध्ये आढावा घेण्याचे निर्देश मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांचा

BMC Action : वृक्षांना इजा आणि परवानगी पेक्षा अधिक झाडांची छाटणी करणाऱ्यांविरोधात महापालिका आक्रमक

मुंबईतील दोन गृहनिर्माण संस्थां विरोधात नोंदवले गुन्हे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गृहनिर्माण संस्थांच्या

Vihar Lake : विहार तलावातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात आता तांत्रिक कपात टळणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी : मुंबईतील कुर्लासह इतर भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहार तलावातील पाणी पुरवठा आता

Mumbai Water Supply : मुंबईचा पाणीसाठ्यात मागील वर्षीपेक्षा वाढ, कासवगतीने ९० टक्क्यांच्याही पुढे मारली बाजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरण आणि तलावांमधील पाणी साठा आता ९० टक्क्यांच्यावर

COVID-19 : साथीच्या आजारांसोबत कोविड आणि एन१एन१च्या रुग्णांतही झालीय वाढ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :मुंबईत साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले असून मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरेसीस,