पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हची भारताने केली पोलखोल

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अपप्रचाराची अर्थात फेक नरेटिव्हची भारताने पत्रकार परिषदेतून पोलखोल केली. पाकिस्तानकडून सतत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूरतगडमधील एस-४०० प्रणाली, नगरोदाचा ब्राह्मोस तळ, देहरागिनीचा तोफखान, चंदिगडमध्ये असलेला दारुगोळा हे नष्ट करण्यासाठी केलेले हवाई हल्ले यशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. प्रत्यक्षात भारताचे असे कोणतेही नुकसान झालेले नाही. भारताने या ठिकाणांचे वेळ आणि तारखेंची नोंद असलेले निवडक फोटो दाखवून पाकिस्तानचा प्रचार खोटा असल्याचे सिद्ध केले.

पाकिस्तानकडून हवाई हल्ल्यांचा प्रयत्न होत आहे तसेच सीमेपलिकडून पाकिस्तानन भारतातील गावांवर आणि सुरक्षा पथकांवर सातत्याने गोळीबार आणि तोफांचा मारा करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेजवळच्या गावांमधील अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. पण पाकिस्तान ७ मे २०२५ पासून १० मे २०२५ च्या दुपारपर्यंतच्या काळात भारताचे हवाई हल्ल्यांद्वारे मोठे नुकसान करू शकलेला नाही. पाकिस्तानने ९ - १० मेदरम्यान रात्री यू-कॅप ड्रोनसह लढाऊ विमानं आणि रॉकेट, क्षेपणास्त्र यांच्याद्वारे भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने भारतात २६ ठिकाणी हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानचे २६ ठिकाणी केलेले हवाई हल्ले परतवून लावले.

पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे मर्यादीत प्रमाणात नुकसान झाले. पण प्रामुख्याने हल्ले परतवण्यात भारत यशस्वी झाला. पाकिस्तानने १० मे रोजी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी हाय स्पीड क्षेपणास्त्राद्वारे पंजाबच्या एका हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने श्रीनगर, उधमपूर, अवंतीपूरच्या हवाई दलाच्या तळांवर तसेच निवडक शाळांवर हवाई हल्ले केले. नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करुन पाकिस्तानने बेजबाबदार वर्तन केले. सीमेपलिकडून गोळीबार करतानाही पाकिस्तानचा भर भारतातील गावांना लक्ष्य करण्याकडे दिसत आहे. पाकिस्तान बेजबाबदार वर्तन करुन तणाव वाढवत आहे. पाकिस्तानच्या सैनिकांच्या सुरू असलेल्या हालचाली बघता सीमेपलिकडून संघर्षाची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते, असेही भारताने पत्रकार परिषदेत सांगितले.
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला