सीएही रणांगणात: आयसीएआयचा केंद्र सरकारसह लष्कराला पाठिंबा, १४ लाख सदस्य ‘ऑपरेशन सिंदूर’साठी सज्ज

१४ लाखांहून अधिक सदस्य आणि विद्यार्थ्यांना सशस्त्र दल आणि राष्ट्रासोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन


नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरील कारवाईला पाठिंबा दर्शवत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक संस्थेने केंद्र सरकार आणि भारतीय लष्करासोबत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला आहे. आयसीएआय अध्यक्ष सीए चरणजोत सिंग नंदा यांनी सांगितले की, संस्थेचे १४ लाखांहून अधिक सीए सदस्य आणि विद्यार्थी ‘ऑपरेशन सिंदूर’ला केवळ शब्दांतच नव्हे तर कृतीतूनही पाठिंबा देतील.


सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर आयसीएआयने सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या आपल्या शाखांमार्फत मदतकार्य, स्वयंसेवा, औषधे, रुग्णवाहिका सेवा, रक्तदान आणि अन्नदान शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे. आयसीएआयच्या १७७ शाखा देशभरात आणि ४७ देशांमध्ये विस्तारल्या आहेत, ज्यातून ते राष्ट्रीय संकटाच्या काळातही सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.



“सीए हे फक्त आर्थिक रक्षक नाहीत, तर राष्ट्रासाठी शक्ती, करुणा आणि लवचिकतेचे आधारस्तंभ आहेत,” असे आयसीएआय उपाध्यक्ष प्रसन्न कुमार डी यांनी सांगितले. संस्थेने मागील युद्ध आणि कोविड काळातही देशसेवा केली असल्याचे उदाहरण देत, यावेळीही "राष्ट्र प्रथम" ही भूमिका घेतली आहे.


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ही भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स व्यवसायाचे नियमन आणि विकास करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट्स कायदा, १९४९ अंतर्गत संसदेच्या कायद्याद्वारे स्थापन केलेली जगातील सर्वात मोठी लेखा संस्था आहे. पाच रिजनल कौन्सिलसह (प्रादेशिक परिषद) भारतातील १७७ तसेच ४७ देशांमधील ५२ परदेशी शाखा आणि ३३ प्रतिनिधी कार्यालयांमध्ये मिळून ४० हजारहून अधिक सदस्य असे मोठे नेटवर्क असलेली आयसीएआय ही मानवतावादी प्रयत्नांमध्ये महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यासाठी अद्वितीयपणे स्थानावर आहे.

Comments
Add Comment

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'

स्मशानभूमीत जळत्या चितेशेजारी मुलांचा अभ्यास

अनोख्या शाळेची देशभरात चर्चा बिहार : सर्वसाधारणपणे शाळा म्हटलं की वर्ग येतात, कॅन्टीन असतं, मुलांना खेळायला

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याकडून भाजप, आरएसएसचे कौतुक!

जुना फोटो शेअर करत म्हणाले, ‘हीच संघटनेची शक्ती…’ नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार

देशात मल्टी-डोअर न्यायालये असावीत, विवादांची सुनावणी नको, ते सोडवावेत

गोव्यात 'मध्यस्थी' विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न पणजी : मध्यस्थता कायद्याच्या दुर्बळतेचे लक्षण नाही, तर तो

रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात बदल; आधार लिंक अनिवार्य

सणासुदीच्या काळात दलालांच्या गैरप्रकारांना आळा नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची कन्फर्म तिकिटे मिळवणे म्हणजे जणू