India Pakistan Conflict: देशविरोधी चिथावणीखोर पोस्ट केल्याबद्दल पुण्यातील तरूणीवर गुन्हा दाखल

पुणे: पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) 22 एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्याचा देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. भारतीय लष्कराने पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवाद्यांचे ९ तळ उद्वस्त केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघर्षाला जोरदार सुरुवात झाली आहे. ज्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे. सोशल मिडियावर तर भारत-पाक हल्ल्यासंदर्भात अनेक माहिती दर मिनिटाला येताना दिसून येत आहे. इतकेच नव्हे तर अनेक मीम्स आणि पोस्ट देखील प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. पण, या दरम्यान देशविरुद्ध चिथावणीखोर (Anti National Provocative Posts) पोस्ट शेअर करण्याच्या दोन घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामधील एक घटना पुण्याची तर दुसरी रायगड येथील आहे.


पुण्यात राहणाऱ्या खतीजा शहाबुद्दीन शेख या १९ वर्षीय तरुणीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'पाकिस्तान जिंदाबाद' असे स्टेटस ठेवत भारताविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणीवर भारतीय न्यायसंहिता कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खतिजा ही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत होती. मात्र या प्रकारानंतर तिला महाविद्यालयाने काढून टाकले आहे. तर, रायगडमधील पेण येथील एका तरुणाला देखील देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई