भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील एकूण ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे. या आदेशानुसार अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई या विमानतळावरुन भारताने नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केली आहे. दिल्ली आणि मुंबई हवाई हद्द विभागात येणारे २५ हवाई मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी १५ मे रोजी पहाटे साडेपाचपर्यंत बंद करण्यात आले आहेत. जमिनीपासून अमर्यादित उंचीपर्यंत हे हवाई मार्ग बंद असतील.


भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागरी विमान वाहतुकीसाठी जारी केलेला बंदी आदेश सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना लागू असेल. सुरक्षित विमान प्रवास आणि विमान प्रवाशांच्या तसेच विमान कंपन्यांच्या हितांच्या रक्षणासाठी हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे बंधन सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांवर लागू असेल. बंदी आदेश तात्पुरता असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

World Emoji Day : तुमचा आवडता इमोजी तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो? जाणून घ्या!

WhatsApp, Instagram, Facebook किंवा DM... https://prahaar.in/2026/07/16/never-practice-these-8-habits-after-waking-up-in-the-morning-they-could-affect-your-health/ कुठेही Chat करताना आपण वापरत असलेले इमोजी आता

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती