भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागातील एकूण ३२ विमानतळांवरील नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवत असल्याचे जाहीर केले आहे. या आदेशानुसार अधमपूर, अंबाला, अमृतसर, अवंतीपूर, भटिंडा, भूज, बिकानेर, चंदिगड, हलवारा, हिंडन, जैसलमेर, जम्मू, जामनगर, जोधपूर, कांडला, कांगडा (गग्गल), केशोड, किशनगड, कुल्लू मनाली (भुंटर), लेह, लुधियाना, मुंद्रा, नलिया, पठाणकोट, पटियाळा, पोरबंदर, राजकोट (हिरासर), सारसावा, शिमला, श्रीनगर, थोइस, उत्तरलाई या विमानतळावरुन भारताने नागरी विमान वाहतूक १४ मे रोजी रात्री १२ पर्यंत बंद केली आहे. दिल्ली आणि मुंबई हवाई हद्द विभागात येणारे २५ हवाई मार्ग नागरी विमान वाहतुकीसाठी १५ मे रोजी पहाटे साडेपाचपर्यंत बंद करण्यात आले आहेत. जमिनीपासून अमर्यादित उंचीपर्यंत हे हवाई मार्ग बंद असतील.


भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नागरी विमान वाहतुकीसाठी जारी केलेला बंदी आदेश सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना लागू असेल. सुरक्षित विमान प्रवास आणि विमान प्रवाशांच्या तसेच विमान कंपन्यांच्या हितांच्या रक्षणासाठी हा बंदी आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे बंधन सर्व नागरी विमान वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांवर लागू असेल. बंदी आदेश तात्पुरता असून परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला