रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच विराट कोहलीही आयपीएल खेळत राहणार आहे.

भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा स्थगित झाली नसती तर नियोजनाप्रमाणे आयोपीएल २५ मे पर्यंत होती. पण तणाव वाढल्यामुळे आठ मे रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएल स्थगित करण्यात आला. आता भारताची पुढील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा ही थेट इंग्लंडमध्येच होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी संघाची निवड होण्याआधीच रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली नसतील. भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करावा लागेल. ही सर्व प्रक्रिया बीसीसीआय पुढील काही दिवसांत पूर्ण करणार आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या कसोटी संघासाठी नव्या कर्णधाराचा विचार करेल. तसेच कसोटी संघात कोणत्या नव्या खेळाडूंना संधी द्यावी याचाही विचार करेल.

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

विराट कोहलीने १२३ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या. त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात नाबाद २५४ धावा ही विराट कोहलीची सर्वोत्तम खेळी आहे.

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी

रोहित शर्माने ६७ आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळून ४०.५७ च्या सरासरीने ४३०१ धावा केल्या. त्याने बारा शतके आणि अठरा अर्धशतके केली. कसोटी क्रिकेटच्या एका डावात २१२ धावा ही रोहित शर्माची सर्वोत्तम खेळी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने गोलंदाज म्हणून ३८३ चेंडू टाकले आणि दोन बळी घेतले आहेत.

 
Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : 'रेड कार्ड'मुळे डॉमिनोज चे ९.५ कोटींचे फ्री पिझ्झा वाटप!

फिफा वर्ल्ड कप २०२६ सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या स्पर्धेतील केवळ खेळाचा थरारच नाही, तर एका

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने रचला इतिहास ! फक्त ७८५ चेंडूंत केला मोठा विक्रम

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द झाला. मात्र, संघाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक कामगिरी! इंग्लंडमध्ये अर्धशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार

चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

IND vs ENG T20 : पावसाचा खेळ! भारत-इंग्लंड पहिला टी-२० सामना रद्द

डरहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० (T20) सामना मुसळधार पावसामुळे रद्द (Cancelled) करण्यात आला. भारतीय संघाचा (Team